• Download App
    भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यक, अन्यथा देशाच्या ऐक्याला धोका; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचा सूचक इशारा Population control bill is crucial, we've limited resources

    भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यक, अन्यथा देशाच्या ऐक्याला धोका; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचा सूचक इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यकच आहे अन्यथा देशातली सामाजिक समरसता संपेल आणि त्यामुळे देशाच्या ऐक्यालाही धोका उत्पन्न होईल, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेताना त्यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. Population control bill is crucial, we’ve limited resources

    केंद्र सरकार लवकरच संसदेत लोकसंख्या नियंत्रण कायदा विधेयक मांडण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांमध्ये देखील हा विषय चर्चेत आहे. आज त्या चर्चेलाच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

     

    देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यकच आहे. कारण चीनने 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी आणल्यानंतर त्या देशात जननदर दर एका मिनिटाला 10 मुले असा आहे, तर भारतात दर एका मिनिटाला 30 मुले जन्माला येतात. अशा स्थितीत आपण चीन सारख्या बलाढ्य देशाशी आर्थिक आणि सामरिक मुकाबला कसा करणार?, हा सवाल गंभीर आहे. याकडे गिरीराज सिंह यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी त्यांनी देशातली वाढती लोकसंख्या सामाजिक असंतुलन निर्माण करून देशाच्या एकतेलाच धोका निर्माण करत आहे. कारण अनियंत्रित लोकसंख्येमुळे देशात सामाजिक समरसता संपण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

    Population control bill is crucial, we’ve limited resources

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Zelenskyy : झेलेन्स्की म्हणाले- पुतिनकडे पैसे संपले तर युद्धही संपेल; जर अमेरिका रशियन तेल टँकर थांबवू शकतो, तर युरोप का नाही?

    Gita Gopinath : ‘भारताला टॅरिफपेक्षा प्रदूषणाचा जास्त धोका; हार्वर्ड प्रोफेसर गीता गोपीनाथ म्हणाल्या- दरवर्षी 17 लाख लोक मरत आहेत, तरीही लक्ष नाही

    Supreme Court : SIR वर सुनावणी, सुप्रीम कोर्टाने म्हटले- प्रक्रिया पारदर्शक असावी; निवडणूक आयोग मनमानी करू शकत नाही