• Download App
    भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यक, अन्यथा देशाच्या ऐक्याला धोका; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचा सूचक इशारा Population control bill is crucial, we've limited resources

    भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यक, अन्यथा देशाच्या ऐक्याला धोका; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांचा सूचक इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यकच आहे अन्यथा देशातली सामाजिक समरसता संपेल आणि त्यामुळे देशाच्या ऐक्यालाही धोका उत्पन्न होईल, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेताना त्यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. Population control bill is crucial, we’ve limited resources

    केंद्र सरकार लवकरच संसदेत लोकसंख्या नियंत्रण कायदा विधेयक मांडण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांमध्ये देखील हा विषय चर्चेत आहे. आज त्या चर्चेलाच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

     

    देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यकच आहे. कारण चीनने 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी आणल्यानंतर त्या देशात जननदर दर एका मिनिटाला 10 मुले असा आहे, तर भारतात दर एका मिनिटाला 30 मुले जन्माला येतात. अशा स्थितीत आपण चीन सारख्या बलाढ्य देशाशी आर्थिक आणि सामरिक मुकाबला कसा करणार?, हा सवाल गंभीर आहे. याकडे गिरीराज सिंह यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी त्यांनी देशातली वाढती लोकसंख्या सामाजिक असंतुलन निर्माण करून देशाच्या एकतेलाच धोका निर्माण करत आहे. कारण अनियंत्रित लोकसंख्येमुळे देशात सामाजिक समरसता संपण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

    Population control bill is crucial, we’ve limited resources

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित