• Download App
    कर्नाटकात तांदळावरून राजकारण तापले, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा केंद्रावर तांदूळ नाकारल्याचा गंभीर आरोप|Politics heated up over rice in Karnataka, Chief Minister Siddaramaiah seriously accused the Center of refusing rice

    कर्नाटकात तांदळावरून राजकारण तापले, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा केंद्रावर तांदूळ नाकारल्याचा गंभीर आरोप

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी म्हणाले – भाजप सरकार गरिबांचे शत्रू आहे. ते फक्त भांडवलदारांचे समर्थन करते. त्यांनी शेवटच्या क्षणी तांदूळ देण्यास नकार दिला. वास्तविक, अन्न भाग्य योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त पाच किलो तांदूळ पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे तांदळाची मागणी केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशा पक्षाला एक मतही देऊ नये, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. क्षीर भाग्य योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्नाटकातील तुमकुरू येथे आयोजित कार्यक्रमात सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली.Politics heated up over rice in Karnataka, Chief Minister Siddaramaiah seriously accused the Center of refusing rice

    केंद्राकडून आम्ही फुकट तांदूळ मागितला नाही

    सिद्धरामय्या म्हणाले- आम्ही भारतीय अन्न महामंडळ (FCI) कडून मोफत तांदूळ मागितलेला नाही. आम्ही त्यांना प्रतिकिलो 36 रुपये देत होतो. सुरुवातीला त्यांनी हो म्हटलं पण शेवटच्या क्षणी नकार दिला. केंद्राच्या दबावाखाली हे काम करण्यात आले. केंद्र सरकारने एफसीआयला आम्हाला तांदूळ देऊ नका, असे निर्देश दिले.



    भाजपने आपल्या कार्यकाळात तांदळाचे प्रमाण कमी केले

    ते म्हणाले की, माझ्या आधीच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना गरीबांना 7 किलो तांदूळ मोफत देत होतो, मात्र भाजपच्या मागील सरकारने तो 4 किलो आणि 5 किलोवर आणला. गरीबांना मोफत तांदूळ दिल्यास राज्ये दिवाळखोर होतील, असे ते म्हणाले होते, असा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.

    पाचपैकी चार निवडणूक गॅरंटी राज्यात लागू

    सिद्धरामय्या म्हणाले की त्यांनी राज्यात पाच पैकी चार निवडणूक गॅरंटी लागू केल्या आहेत. या चार गॅरंटी खालीलप्रमाणे…
    ‘शक्ती’ योजनेअंतर्गत महिलांना लक्झरी नसलेल्या सरकारी बसमध्ये मोफत बस प्रवास दिला जात आहे.
    ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला 2 हजार रुपये दिले जातात.
    ‘गृहज्योती’ योजनेअंतर्गत प्रत्येक घराला 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे.
    ‘अन्न भाग्य’ योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना 10 किलो तांदूळ दिला जात आहे.

    Politics heated up over rice in Karnataka, Chief Minister Siddaramaiah seriously accused the Center of refusing rice

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी