इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने ‘इंडिया स्टँड विथ मोदीजी’ असा हॅशटॅग लिहिला आहे. PM SECURITY: Kangana says this incident is shameful – it is a direct attack on democracy! Attacking them means attacking every citizen of the country …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत ने पंजाबमधील सुरक्षेतील हलगर्जीपणाची घटना लज्जास्पद आणि लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “पंजाबमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे.आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते/प्रतिनिधी आणि 140 कोटी जनतेचा आवाज आहेत.त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकावर हल्ला करणे होय.हा सुद्धा आपल्या लोकशाहीवरचा हल्ला आहे. तसेच पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत आहे.आपण आता हे थांबवले नाही तर देशाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.” यासोबत कंगनाने ‘इंडिया स्टँड विथ मोदीजी’ असा हॅशटॅग लिहिला आहे.
काही काळापूर्वी कंगना राणौतही या ‘आंदोलकांच्या’ गर्दीची शिकार झाली होती. पंजाबमधील किरतपूर बुंगा साहिबमध्ये कंगनाच्या गाडीवर शेतकऱ्यांनी हल्ला केला होता.तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आणि लाइव्ह व्हिडिओही दाखवला.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस असूनही तथाकथित शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून हल्ला केल्याचे तिने सांगितले.
नेमक प्रकरण काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (५ जानेवारी २०२२) पंजाबमधील फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करणार होते, परंतु सुरक्षा व्यवस्थेतील मोठ्या त्रुटीमुळे ती रद्द करण्यात आली. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा जेव्हा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. पंतप्रधान सुमारे 15-20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते.
PM SECURITY : Kangana says this incident is shameful – it is a direct attack on democracy! Attacking them means attacking every citizen of the country …
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंजाब सरकारच्या बचावात शेतकरी नेते टिकैत, फुल आखाड्यात!!
- BREAKING NEWS : GOOD DECISION-आता पोलिसांनाही Work From Home; महाविकास आघाडी सरकारचा कौतुकास्पद निर्णय
- PM SECURITY : पंजाब-मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात; सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल; उद्या सुनावणी
- मुंबई : महापालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयात कोरोनाबधितांना भरती करता येणार नाही