‘धमकी देणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे’ अशी टीकाही मोदींनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्यासह 600 हून अधिक वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. न्यायपालिकेवर धोक्याचे ढग दाटून येत असून राजकीय आणि व्यावसायिक दबावापासून स्वतःचे संरक्षण करावे लागेल, असे वकिलांनी पत्रात म्हटले आहे.PM Modis reaction to the letter sent by lawyers to the Chief Justice
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इतरांना धमकावणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. केवळ 5 दशकांपूर्वीच त्यांनी “कमिटेड न्यायपालिका” ची हाक दिली होती – ते निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांकडून वचनबद्धता शोधतात परंतु राष्ट्राप्रती कोणतीही वचनबद्धता टाळतात. 140 कोटी भारतीय त्यांना नाकारतात यात आश्चर्य नाही.
हे पत्र ज्येष्ठ वकील हरीश साळवे, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होला, स्वरूपमा चतुर्वेदी आणि देशभरातील 600 हून अधिक वकिलांच्या वतीने CJI चंद्रचूड यांना पाठवण्यात आले आहे. एक विशिष्ट गट न्यायव्यवस्थेची अखंडता कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. त्यावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात वकिलांनी म्हटले आहे की, हा गट न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहे. यामध्ये विशेषतः राजकीय व्यक्तींशी संबंधित प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समावेश आहे. या कृतींमुळे लोकशाही संरचना आणि न्यायिक प्रक्रियांवर ठेवलेल्या विश्वासाला महत्त्वपूर्ण धोका निर्माण झाला आहे, असे या पत्रात म्हटले आहे. सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात वकिलांनी म्हटले आहे की, हा विशिष्ट गट न्यायव्यवस्थेच्या तथाकथित ‘सुवर्णयुगा’बद्दल खोट्या कथा पसरवत आहे. ज्याचा उद्देश सध्याच्या न्यायालयीन कामकाजाला बदनाम करणे आणि न्यायालयावरील जनतेचा विश्वास कमी करणे हा आहे.
PM Modis reaction to the letter sent by lawyers to the Chief Justice
महत्वाच्या बातम्या
- निर्मला सीतारामन म्हणाल्या- माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत; आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूतून लढण्याचा पर्याय होता, पण मी नकार दिला
- काका – पुतण्याचे पक्ष वेगळे होऊनही “राष्ट्रवादी काँग्रेस” नावाच्या ब्रँडचे आकुंचनच!!
- Loksabha Election : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांना दिली उमेदवारी
- ‘तुरुंगातून दिल्ली सरकार चालणार नाही’ ; उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांचा केजरीवालांना धक्का!