पंतप्रधान मोदी यांनी WITT मध्ये सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) शिखर परिषदेत देशाच्या प्रगती, भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेली पावले आणि सरकारच्या धोरणांबद्दल सविस्तर भाष्य केले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कामकाजाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, ज्या एजन्सीचा रात्रंदिवस गैरवापर केला जातो, त्यांनी आतापर्यंत २२ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत आणि देशातील जनतेला त्यांचे हक्क परत केले आहेत. त्यांनी असेही सांगितले की, गेल्या १० वर्षांत त्यांच्या सरकारने अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे.PM Modi
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांचे सरकार जनतेच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. ते म्हणाले की, ईडीच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत २२ हजार कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, जे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांद्वारे जनतेकडून हिसकावून घेण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार भ्रष्टांविरुद्ध कठोर कारवाई करत आहे आणि आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, जे पूर्वी जनतेला लुटायचे त्यांना आता तेच पैसे परत करावे लागत आहेत.
PM Modi said The ED which is criticized day and night has recovered 22 thousand crores
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule ‘’हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी…’’
- Bangladeshis : मुंबईत १७ बांगलादेशींना अटक; चेन्नईमध्ये जाफरच्या एन्काउंटरनंतर ठाणे पोलिस सतर्क
- MP Naresh Mhaske : ‘’ विरोधकांच्या ‘इंडि’ आघाडीचे नाव ‘औरंगजेब फॅन क्लब’ असायला हवे’’
- Foreigners act : भारत म्हणजे धर्मशाळा नाही, की कोणीही येऊन बसावं; रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना अमित शाहांनी ठणकावले!!