• Download App
    'माध्यमे लोकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात' ; मुंबईतील INS कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं विधान! PM Modi said 'Media makes people aware of their power'

    ‘माध्यमे लोकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात’ ; मुंबईतील INS कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं विधान!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) च्या सचिवालय INS टॉवरचे उद्घाटन केल्यानंतर भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनणार असल्याचे सांगितले. डिजिटल पेमेंटमध्ये भारत कसा अग्रेसर झाला आहे याचाही मोदींनी उल्लेख केला. PM Modi said ‘Media makes people aware of their power’

    मोदी म्हणाले, “एक काळ होता जेव्हा काही नेते म्हणायचे की डिजिटल व्यवहार भारतासाठी नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान या देशात काम करू शकत नाही, अशी त्यांची पूर्वकल्पना होती.

    पंतप्रधान म्हणाले, “तथापि, जग देशातील लोकांच्या क्षमतांकडे पाहत आहे. आज भारत डिजिटल व्यवहारात नवीन विक्रम करत आहे. भारताच्या UPI आणि आधुनिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे आणि त्यांना एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवणे सोपे झाले आहे.



    इंडियन न्यूजपेपर सोसायटीने केलेल्या प्रभावी कामाचा देशाला फायदा होईल, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले, “माध्यमे लोकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात.” तसेच ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांची नैसर्गिक भूमिका ही चर्चा सुरू करणे आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अहवालानुसार, गेल्या तीन ते चार वर्षांत देशात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे बेरोजगारीबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांची मुस्कटदाबी झाली.

    रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्रातील २९,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर मोदी मुंबईच्या गोरेगाव उपनगरात एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) तिसऱ्या कार्यकाळाचे लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी उत्साहाने स्वागत केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. केवळ एनडीए सरकारच स्थैर्य देऊ शकते हे लोकांना माहीत आहे, असे मोदी म्हणाले.

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा बनवणाऱ्या विरोधी पक्षांवर निशाणा साधत मोदी म्हणाले, “आरबीआयने अलीकडेच रोजगाराबाबत सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार, गेल्या तीन-चार वर्षांत सुमारे आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या आकडेवारीने नोकऱ्यांबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    PM Modi said ‘Media makes people aware of their power’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले