• Download App
    'देशाला गरिबी आणि भ्रष्टाचारापासून पूर्णपणे मुक्त करण्याची वेळ आली आहे'|PM Modi said in Aligarh Time has come to rid the country completely of poverty and corruption

    ‘देशाला गरिबी आणि भ्रष्टाचारापासून पूर्णपणे मुक्त करण्याची वेळ आली आहे’

    अलीगढमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान


    विशेष प्रतिनिधी

    अलीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अलीगढमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.PM Modi said in Aligarh Time has come to rid the country completely of poverty and corruption

    अलीगढच्या नुमाईश मैदानावर रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, याच मैदानात मला अलिगढच्या लोकांना भेटण्याची अनेकवेळा संधी मिळाली आहे, शेवटच्या वेळी मी अलीगढला आलो होतो तेव्हा, मी तुम्हा सर्वांना समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार व तुष्टीकरणाच्या फॅक्टरीला टाळे ठोकण्याच विनंती केली होती, तुम्ही ते इतके मजबूत टाळे लावले की आजतागायत दोन्ही राजपुत्रांना चावी सापडलेली नाही.



    लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि विरोधी पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत.

    दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपकडून मोठ्या प्रमाणात रॅली होत आहेत. आज म्हणजेच सोमवारी मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्याही सभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सीतापूरमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक लखीमपूर खेरी आणि उन्नावमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.

    PM Modi said in Aligarh Time has come to rid the country completely of poverty and corruption

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले