• Download App
    'टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दिला होता धोका, पण यंदा तू...' PM Modi interacted with Olympic medalist Manu Bhakar

    Manu Bhakar : ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दिला होता धोका, पण यंदा तू…’

    पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरशी संवाद साधला PM Modi interacted with Olympic medalist Manu Bhakar

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारी स्टार नेमबाज मनू भाकर हिला फोन करून तिचे अभिनंदन केले. या पदकासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदक खाते उघडले आहे. मनू भाकरने (Manu Bhakar) 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजीत कोणतेही पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.



    मनू भाकर हिचे फोनवर अभिनंदन करण्यासोबतच पंतप्रधान मोदींनी इतर सहकारी खेळाडूंच्या स्थितीबद्दलही विचारले. मोदींनी मनूला सांगितले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने तुला धोका दिला होता, पण यावेळी तू सर्व उणीवा भरून काढल्या आणि पदक जिंकले.

    मोदी फोनवर म्हणाले, ‘तुझे खूप खूप अभिनंदन, तुझ्या यशाची बातमी ऐकल्यानंतर मी उत्साहित आणि आनंदी आहे. केवळ, .1 गुणामुळे रौप्य पदक राहिले. पण असे असतानाही तू देशाला वैभव मिळवून दिले. तुला दोन प्रकारचे क्रेडिट मिळत आहे. प्रथम, तू कांस्य पदक आणले आहेस आणि नेमबाजीत पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला आहेस. माझ्याकडून अभिनंदन.

    ते म्हणाले, ‘हे बघ, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने तुझा घात केला. पण यावेळी तू सर्व उणीवा भरून काढल्या आहेत. मला पूर्ण आशा आहे की तू भविष्यातही चांगले कामगिरी करशील, सुरुवात खूप चांगली आहे, त्यामुळे तुझा उत्साहही वाढेल आणि तुझा आत्मविश्वासही वाढेल. देशालाही याचा फायदा होणार आहे.

    PM Modi interacted with Olympic medalist Manu Bhakar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे