वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली. एका मुलाखतीत, राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्या बाजूने उठलेल्या आवाजावर, पंतप्रधान म्हणाले, ‘निवडणूक भारताची आहे आणि भारताची लोकशाही खूप परिपक्व आहे, निरोगी परंपरा आहे आणि देशातील मतदारदेखील कोणत्याही बाह्य शक्तींमुळे प्रभावित होणार नाहीत.PM Modi criticizes AAP with Congress; Pakistan’s support to Rahul-Kejriwal is a subject of investigation!
मला कळत नाही की आपल्याशी शत्रुत्व असलेल्यांना काही माेजके लाेकच पसंती का देतात. ज्यांच्या माेजक्या लाेकांच्याच समर्थनार्थ तिथून आवाज का उठतो. आता ही गंभीर बाब तपासाची आहे. भ्रष्टाचारावर मोदी म्हणाले की, कालपर्यंत जे लोक वकिली करत होते, आज त्याच गोष्टींना विरोध करत आहेत. पूर्वी हेच लोक म्हणायचे की सोनियाजींना तुरुंगात टाका, आता ते ओरडत आहेत. म्हणूनच लहान लोकांनी तुरुंगात जायचे की माेठ्या मगरींनी हे लोकांना सांगणे हे माध्यमांचे काम आहे असे मला वाटते.
बाँडला पर्याय शोधावा लागेल- शहा
इलेक्टोरल बाँड योजना रद्द करण्याच्या निर्णयानंतर या लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा प्रभाव वाढेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. काळ्या पैशाचा प्रभाव वाढला तर पर्याय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले.
PM Modi criticizes AAP with Congress; Pakistan’s support to Rahul-Kejriwal is a subject of investigation!
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी 1 जूनच्या ‘इंडी’ आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत!
- रेमल वादळाचा तडाखा! बंगालमध्ये सहा आणि बांगलादेशात 10 जणांचा मृत्यू
- राहुल गांधींनी आधी भारतीय सैन्यात काम करून दाखवावे, मग अग्निवीर योजनेविषयी बडबड करावी; जनरल व्ही. के. सिंग यांचा इशारा!!
- लष्करप्रमुख मनोज पांडे यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ