या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच शेतकरी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल.PM Kisan: Important news for farmers; You will not get Rs. 2000 without ration card
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांच्या कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक साहाय्य मिळावं याकरता सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच शेतकरी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल.
आता या योजनेचा लाभ पीएम किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक टाकल्यानंतरच मिळणार आहे. आता या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर रेशन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक असेल. त्याच वेळी, रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेबरोबरच, आता नोंदणी दरम्यान पोर्टलवर फक्त कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) बनवाव्या लागतील आणि अपलोड कराव्या लागतील.
या अंतर्गत, खातौनी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणेच्या हार्ड कॉपी जमा करणे आता गरजेचे नाही. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक होणार आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
१) तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते.
२) तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
३) तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
४) पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा.
५) आधार लिंक करण्यासाठी, तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि एडिट डिटेलच्या पर्यायावर क्लिक करून अपडेट करा.
३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करा, मिळतील ४००० रुपये
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नोंदणी करण्याची संधी आहे. जर तुम्ही आता अर्ज केला आणि तो अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये २००० रुपये आणि डिसेंबरमध्ये २००० रुपये मिळतील. अशाप्रकारे तुम्हाला ४००० रुपये मिळू शकतात.
शेतकरी दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत
आता शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १०व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे ९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येकी २००० रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच ६००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवते. या योजनेचा उद्देश देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना थेट आर्थिक मदत करणे हा आहे.
PM Kisan : Important news for farmers; You will not get Rs. 2000 without ration card
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
- मुंबई विमानतळावर दीड कोटी रुपयांचे सोनं जप्त, स्मगलिंगची पद्धत तर निराळीच , वाचा नेमक सोनं आणल कस ?
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोनाच्या AY.4 व्हेरिएंटची लागण, इंदूरमध्ये 6 रुग्ण आढळले, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?
- Bank Holidays November 2021 : नोव्हेंबरमध्ये 17 दिवस बँका बंद राहणार! ही आहे सुट्यांची यादी!