• Download App
    Pinaki Mishra आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का, महुआ मोइत्रा यांच्या पतीवर गंभीर आरोप

    आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का, महुआ मोइत्रा यांच्या पतीवर गंभीर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माजी खासदार व वरिष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग तसेच संसदेत भारताच्या संरक्षणविषयक संवेदनशील मुद्द्यांवर रशियाविरोधी प्रश्न विचारून राष्ट्रीय सुरक्षेला धक्का दिल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. बीजू जनता दलाचे नेते असलेले मिश्रा यांनी अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याशी विवाह केला आहे. Pinaki Mishra

    २५ ऑगस्ट रोजी गृहमंत्रालय आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) येथे दाखल झालेल्या दोन तक्रारींमध्ये हे आरोप नोंदविण्यात आले आहेत. एका तक्रारीत मिश्रा यांच्या मालमत्ता खरेदी व आर्थिक व्यवहारातील अनियमितता अधोरेखित करण्यात आली आहे, तर दुसऱ्या तक्रारीत त्यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख आहे. या प्रश्नांमध्ये भारताच्या अणु पाणबुड्या, क्षेपणास्त्र प्रणाली आणि महत्त्वाच्या संरक्षण करारांबाबत माहिती मागविण्यात आली होती, असे नमूद करण्यात आले आहे.

    तक्रारीनुसार दिल्लीतील गोल्फ लिंक आणि जोर बाग येथील दोन महागड्या बंगल्यांची खरेदी थेट न करता कंपन्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यामुळे विक्री दस्तऐवजांमध्ये थेट नाव नोंदविण्याऐवजी कंपनी हस्तांतरणाच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

    याशिवाय, हाँगकाँगस्थित एका व्यक्तीकडून मिश्रा यांच्या माजी पत्नी संगीता मिश्रा यांच्या खात्यावर जमा झालेल्या ३,०५,००० अमेरिकी डॉलरच्या रकमेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही रक्कम “प्रेम व आपुलकीतून दिलेली भेट” म्हणून दाखविण्यात आली असली तरी तक्रारदाराने हा व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

    तक्रारदाराच्या मते, हे केवळ तांत्रिक चुका नसून निधीच्या खऱ्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे.

    Pinaki Mishra charged with financial irregularities, money laundering

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार

    India Wins : भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला; इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा