विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी – आसाममध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दलदल असलेल्या एका तलावात अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूपरित्या बाहेर काढले.People saved five elphants
मेघालय सीमेलगत असलेल्या गोलपारा जिल्ह्यात चोईबाडी भागात बुधवारी रात्री हत्तीचा एक कळप तलावात फसला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दोन ग्रामस्थांनी दलदल असलेल्या तलावाचा काठावर खोदकाम केले आणि त्यामुळे हत्तींना बाहेर येण्यास सोपे झाले.पाच हत्तींचा कळप हा मेघालयाच्या जंगलातून आसाममध्ये आला असावा, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने दोन हत्तींचा मृत्यू झाला.
People saved five elphants
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचार्यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा : प्रवीण दरेकर
- ‘सामना’तून शिवसेनेचा ममता दीदींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे सध्याच्या सरकारला बळ देण्यासारखंच!
- Omicron Variant : सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाचा खुलासा – कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ओमिक्रॉन जास्त धोकादायक असल्याचा सध्या पुरावा नाही!
- आत्मनिर्भर भारतातून संरक्षणाचा बूस्टर डोस; अमेठीत बनणार ५ लाख ए के २०३ एसॉल्ट रायफली!!