• Download App
    थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम|Overdue loan recovery closed after 7pm; Agents will not be able to make calls till 8 am, RBI brings new rules

    थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम

    वृत्तसंस्था

    मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ग्राहकांना कॉल करण्यासाठी नवीन नियम प्रस्तावित केली आहेत.Overdue loan recovery closed after 7pm; Agents will not be able to make calls till 8 am, RBI brings new rules

    आता रिकव्हरी एजंट कर्जधारकांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीत. धमकीही देऊ शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने बँकांना वसुली एजंटांसाठी आचारसंहिता तयार करण्यास सांगितले आहे.



    30 दिवसांच्या आत CIBIL मध्ये सुधारणा करा, अन्यथा तुम्हाला प्रतिदिन 100 रुपये भरपाई म्हणून भरावे लागतील.याशिवाय आरबीआयने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांसाठी कडक सूचना दिल्या आहेत. कर्ज ग्राहकांचे CIBIL स्कोअर वेळेवर अपडेट न करणे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना महागात पडेल. अशा तक्रारी 30 दिवसांत निकाली काढण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत. विलंबासाठी प्रतिदिन 100 रु. दंड आकारला जाईल. तक्रारदाराला ही रक्कम मिळणार आहे.

    दंडाशिवाय 1 कोटी रुपयांपर्यंतची एफडी रिडीम करू शकतील

    आता लोक निश्चित कालावधीसाठी जमा केलेले 1 कोटी रुपये परिपक्व होण्यापूर्वी काढू शकतील. कोणताही दंड भरावा लागणार नाही. ही मर्यादा आतापर्यंत 15 लाख रुपये आहे. होते. रिझर्व्ह बँकेचा आदेश सर्व व्यावसायिक आणि सहकारी बँकांना लागू असतील.

    आयआरडीएची समिती स्थापन, विमा पॉलिसीची भाषा सोपी असेल

    विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI ने विमा पॉलिसींची भाषा सोपी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती क्लिष्ट शब्दांऐवजी ‘सोपे’ शब्द सुचवेल. ती 10 आठवड्यांत शिफारसी देईल. IRDAI ने सांगितले की, पॉलिसी घेणाऱ्यांना भाषेच्या गुंतागुंतीमुळे विमा पॉलिसी करार समजण्यात अडचणी येतात.

    Overdue loan recovery closed after 7pm; Agents will not be able to make calls till 8 am, RBI brings new rules

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaram Bapu Bail : सुप्रीम कोर्टाने म्हटले- आसारामला आम्ही जामीन देणार नाही; जीवाला धोका असेल, तरच विचार करू; राजस्थान सरकारकडून उत्तर मागवले

    Ethanol Allocation : इथेनॉल वाटपात बदल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सरकारने सांगितले- 20% इथेनॉल मिश्रणाचे धोरण बदलणार नाही

    19 जूनला राहुल गांधी बनले होते “परशुराम”; एक जुलैला अखिलेश बनले “कृष्ण”; पण दोघांच्याही सनातन प्रेमावर ठळक प्रश्नचिन्ह!!