• Download App
    विरोधकांनी CAAवर खोटेपणाचे राजकारण थांबवावे, कोणाचीही नोकरी धोक्यात नाही - रविशंकर प्रसाद Opposition should stop lying politics on CAA no one's job is at stake Ravi Shankar Prasad

    विरोधकांनी CAAवर खोटेपणाचे राजकारण थांबवावे, कोणाचीही नोकरी धोक्यात नाही – रविशंकर प्रसाद

    निरर्थक प्रचार केला जात आहे. हेच लोक रोहिंग्यांच्या बाजूने उभे आहेत, असं म्हणत विरोधकांवर निशाणाही साधला Opposition should stop lying politics on CAA no one’s job is at stake Ravi Shankar Prasad

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सीएएबाबत सातत्याने वक्तव्य करणाऱ्या विरोधी नेत्यांना फटकारले आहे. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते सीएएबाबत सतत संभ्रम पसरवत आहेत. विरोधकांनी खोटेपणाचे राजकारण थांबवावे. CAA मुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, कोणाच्या नोकरीला धोका नाही.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की CAA लागू करून केंद्र सरकार पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारतात स्थायिक होण्यासाठी आमंत्रित करू इच्छित आहे. त्यांना घर आणि नोकऱ्या देणार. आमच्या मुलांमुळे आलेला पैसा ते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना भारतात स्थायिक करण्यासाठी खर्च करतील, असा आरोप त्यांनी केला.

    यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एक विचित्र विधान आले आहे. हा कोणता तर्क आहे? कोणाचेही नागरिकत्व घेत नाही. केजरीवाल व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनीही CAA संदर्भात स्पष्ट केले की कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. निरर्थक प्रचार केला जात आहे. हेच लोक रोहिंग्यांच्या बाजूने उभे आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

    Opposition should stop lying politics on CAA no one’s job is at stake Ravi Shankar Prasad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gujarat : गुजरातेत UCC विधेयक सभागृहात बहुमताने मंजूर, देशातील दुसरे राज्य बनले; विधानसभेत हलाला प्रथा, अभिनेते धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाचीही चर्चा

    Karnataka : कर्नाटकात पॉलिसी- मुलांचा स्क्रीन टाइम 1 तास असावा; संध्याकाळी 7 नंतर इंटरनेट बंद; 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मसुदा जारी

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा- धर्म बदलला तर एससी दर्जा, आरक्षण संपणार; पाद्रीची याचिका फेटाळली