- अमित शाह काय म्हणाले होते?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी बुधवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.Opposition parties attacked Amit Shahs statement against Nehru BJP also responded
ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
तर, भाजप नेत्यांनी लोकसभेत अमित शाह नेहरूंबद्दल जे काही बोलले ते खरे होते आणि इतिहास सांगावा लागेल असे म्हणत पलटवार केला.
तर ”नेहरूंच्या काळात झालेल्या चुकांचा फटका काश्मीरला वर्षानुवर्षे सहन करावा लागला. पहिली आणि सर्वात मोठी चूक- जेव्हा आपले सैन्य जिंकत होतं, मात्र पंजाबचं क्षेत्र येताच युद्धविराम(सीजफायर) लागू करण्यात आला आणि पीओकेचा जन्म झाला. जर तीन दिवसानंतर युद्धविराम केला गेला असता, तर आज पीओके भारताचा भाग असला असता. याचबरोबर दूसरी चूक म्हणजे भारताचा अंतर्गत मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जाणे ही होती.” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले होते.
Opposition parties attacked Amit Shahs statement against Nehru BJP also responded
महत्वाच्या बातम्या
- काय सांगता! सूर्याला पडले 60 पृथ्वी मावतील एवढे छिद्र; वेगवान सौर वाऱ्यांमुळे रेडिओ कम्युनिकेशन ठप्प होण्याचा इशारा
- I.N.D.I.A ची बैठक खरगेंच्या घरी संपन्न; नितीश, स्टॅलिन आणि अखिलेश अनुपस्थित, ममता म्हणाल्या- 7 दिवसांपूर्वी सांगायला हवे होते
- मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईत विध्वंस; 72 तास वीज गुल, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले अन्न
- अमित शहांनी लोकसभेत नेहरूंचे पत्रच वाचून दाखवले; म्हणाले- नेहरूंनीच शेख अब्दुल्लांना सांगितले होते, काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे चूक होती