• Download App
    Operation Ajay : इस्रायलहून २७४ भारतीयांना घेऊन दिल्लीला सुखरूप परतले चौथे विमान Operation Ajay The fourth flight carrying 274 Indians from Israel returned safely to Delhi

    Operation Ajay : इस्रायलहून २७४ भारतीयांना घेऊन दिल्लीला सुखरूप परतले चौथे विमान

     इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारत तेथे उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांसाठी चिंतेत आहे. इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. Operation Ajay The fourth flight carrying 274 Indians from Israel returned safely to Delhi

    ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत, रविवारी (15 ऑक्टोबर) सकाळी आणखी दोन उड्डाणे राष्ट्रीय राजधानीत दाखल झाली. एका विमानात 197 तर दुसऱ्यामध्ये 274 प्रवासी होते. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी भारतीय नागरिकांचे तिरंग्यासोबत स्वागत केले.

    इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की सरकारचे मुख्य लक्ष तेथे अडकलेल्या 18 हजार भारतीयांना परत आणणे आहे. इस्रायलमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या भारतीयांना परत आणण्यावर आमचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. यामध्ये विद्यार्थ्यांसह  भारतीय नागरिक  आहेत.

    तेल अवीव येथून 197 प्रवाशांसह तिसरे विमान पहाटे 4 वाजता येथील दिल्ली विमानतळावर पोहोचले. 274 भारतीय नागरिकांना घेऊन इस्रायलहून आलेले चौथे विमान सकाळी 7 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले. यापूर्वी, ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत, गुरुवारी 212 लोकांसह एक विमान दिल्लीत पोहोचले होते, तर दुसऱ्या विमानाने शनिवारी इस्रायलमधून 235 भारतीय नागरिकांना आणले होते.

    Operation Ajay The fourth flight carrying 274 Indians from Israel returned safely to Delhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ram temple : अयोध्येतील राम मंदिराचे शिखर सोन्याने झळकले; राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा 5 जून रोजी

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!

    Rahul Gandhi and Jairam Ramesh : राहुल गांधी + जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”; पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”!!