विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले होते आणि आता कांद्याच्या भावानेही तोच मार्ग अवलंबला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये एका आठवड्यात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. याशिवाय बेंगळुरू, पंजाब, मुंबई आणि देशातील इतर शहरांमध्ये कांद्याचा भाव 100 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.Onion Price Hike Onion is going the way of tomato, the price doubles in a week; Rates can go up to Rs 150
वृत्तानुसार, कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी बंगळुरूमध्ये कांद्याचा घाऊक दर 70 रुपये किलो होता, जो आठवड्यापूर्वी 50 रुपये होता. त्याच वेळी, किरकोळ दरात 39 रुपयांवरून 80 रुपये किलोपर्यंत वाढ झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कांद्याचे भाव आणखी काही दिवस उच्च पातळीवर राहतील आणि ते 100 रुपयांच्या पुढे जाऊन 150 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.
कांद्याचे भाव दुपटीने वाढले
स्थानिक शेतकऱ्यांकडून कांद्याचा कमी पुरवठा होत असल्याने त्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. हुबळीमध्ये एका आठवड्यात कांद्याचा भाव 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल वरून 6000 ते 6600 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तसेच किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 30 ते 35 रुपये किलोवरून 75 ते 80 रुपये किलो झाला आहे. अवघ्या आठवडाभरात या किमती वाढल्या आहेत.
सरकारने काय योजना आखल्या?
वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत. शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर शुल्क जाहीर करण्यात आले. आता डिसेंबरपर्यंत कांद्याचा निर्यात दर 60 रुपये प्रति किलो असेल, जो पूर्वी 40 रुपये किलो होता. निर्यात शुल्क वाढवल्यास अधिकाधिक कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पोहोचेल, ज्यामुळे भाव कमी होऊ शकतात.
कांद्याचे भाव एवढ्या वेगाने का वाढत आहेत?
एचटीच्या म्हणण्यानुसार, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाजारात उपलब्ध असलेल्या कांद्याचा शेवटचा साठा साठवला जात आहे, त्यामुळे पुरवठा झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा कमी झाल्याने कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. या अहवालानुसार सरकारने याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर कांद्याचा भाव 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो.
Onion Price Hike Onion is going the way of tomato, the price doubles in a week; Rates can go up to Rs 150
महत्वाच्या बातम्या
- थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम
- टाटा समूह भारतात आयफोन बनवणार; टाटाचा विस्ट्रॉनशी 1,000 कोटी रुपयांचा करार, 2.5 वर्षांत सुरू होईल उत्पादन
- काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?’, भाजपाचा थेट सवाल!
- केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ”सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी घट , मात्र…”