• Download App
    भारतात दर 4 मिनिटांना हृदयविकाराने एकाचा मृत्यू; एम्सच्या डॉक्टरांचा इशारा One dies of heart disease every 4 minutes in India; AIIMS doctor's warning

    भारतात दर 4 मिनिटांना हृदयविकाराने एकाचा मृत्यू; एम्सच्या डॉक्टरांचा इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्रोफेसर m.v श्रीवास्तव पद्मा श्रीवास्तव (एम्स) यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. त्यात त्या म्हणाल्या भारतातील मृत्यूचे दुसरे मोठे कारण म्हणजे हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक या कारणाने भारतात दर 4 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. One dies of heart disease every 4 minutes in India; AIIMS doctor’s warning

    सर गंगाराम हॉस्पिटलने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात न्यूरोलॉजिस्ट म्हणाल्या. भारतात दरवर्षी एकूण 1 लाख 85 हजार लोकांचा मृत्यू हार्ट अटॅक ने होतो. या दरम्यान दर 40 सेकंदात एक स्ट्रोक हृदयात बसत असतो. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज GBD यांच्या म्हणण्यानुसार भारतात 68.6 टक्के हार्ट स्ट्रोक घडतात तर 70.9 पर्सेंट या स्ट्रोक्समुळे मृत्यू होतात. आणि 77.7 लोक यातून डिसिबल होतात.या वर्षभरात हे घडताना दिसले आहेत.

    पद्मश्री प्राप्त प्रोफेसर पद्मा श्रीवास्तव यावर म्हणाल्या की, हार्ट अटॅकची वाढती संख्या भारताला घातक ठरणार आहे. या स्ट्रोक्समुळे विशेषतः मध्यमवर्ग्यांमध्ये अडचणी निर्माण होताना दिसणार आहेत. यासाठी लवकरात लवकर चांगले उपाय शोधणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट वाईट आहे. हे हार्ट स्ट्रोक सध्याच्या युवा वर्गात जास्त घडताना दिसत आहेत. जवळजवळ 5.2 मिलियन म्हणजेच 31 टक्के मुलांमध्ये हा त्रास आढळून येतो . 20 वर्षाच्या आतील मुले हार्ट स्ट्रोकला सामोरी जात आहेत.

    टेली मेडिसिन आणि टेलिस्ट्रोक सुविधा उपलब्ध करणे हि समाजातील आर्थिक आणि भौगोलिक दृष्ट्या अपंग व वंचित व्यक्तींना जोडण्यासाठीची अंमलबजावणी ही एक महत्त्वाची रणनीती ठरू शकते. असे श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील थॉमस डेफर्सन विद्यापीठातील संशोधकाने नुकताच केलेला अभ्यासात. स्ट्रोक्स नंतर बरे होण्यात येणाऱ्या अडचणींची शक्यता ही 2.5 टक्के वाढली आहे.

    One dies of heart disease every 4 minutes in India; AIIMS doctor’s warning

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Yogi government : योगी सरकार ‘सपा’ खासदाराशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटू रिंकू सिंगला देणार सरकारी नोकरी

    Mumbai : मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर अटक

    Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था; 10 हजार पोलीस, NSG, ड्रोन, स्नायपर्स अन् AI