• Download App
    corona patient भारतात कोरोना रुग्णांची संख्येने ओलांडला

    corona patient : भारतात कोरोना रुग्णांची संख्येने ओलांडला पाच हजारांचा टप्पा ; २४ तासांत ४ मृत्यू

    corona patient

    जाणून घ्या, महाराष्ट्रातील परिस्थिती नेमकी काय आहे?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : corona patient  भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी, संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५००० च्या पुढे गेली आहे. राज्य सरकारांनी कोरोनाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने सुविधा-स्तरीय तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन देखील केले आहे.corona patient

    भारतात सध्या कोरोनाचे ५,३६४ पॉझिट्व्ह रुग्ण आहेत. शुक्रवारपर्यंत, गेल्या २४ तासांत चार नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळ हे कोरोनाबाबत सर्वाधिक प्रभावित राज्य राहिले आहे. त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.



     

    गेल्या २४ तासांत केरळमध्ये १९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८ आणि दिल्लीमध्ये ३० कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाचे ४९८ नवीन रुग्ण आढळले आहेत.

    दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाचे ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९२ वर पोहोचली आहे. १ जानेवारीपासून दिल्लीत कोरोनामुळे सात मृत्यूंची नोंद झाली आहे. गुरुवारपासून एकही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. कोविड-१९ रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्राने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

    महाराष्ट्रात कोरोनाचे ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. या वर्षी जानेवारीपासून एकूण रुग्णांची संख्या १,२७६ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे.

    Number of corona patients in India crosses 5000 mark 4 deaths in 24 hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Madras High Court : मद्रास हायकोर्टाने म्हटले- समलैंगिक जोडपे कुटुंब बनवू शकतात; लग्न कुटुंब स्थापन करण्याचा एकमेव मार्ग नाही

    Mamata Banerjee : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत तृणमूलच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपने घेतली आक्रमक भूमिका

    Siddaramaiah : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी आपल्याच राजकीय सल्लागाराला पदावरून काढले!