• Download App
    North Central Railway Recruitment 2021:दहावी पास असणार्यांसाठी महत्त्वाची बातमी;दहावीच्या गुणांवर थेट रेल्वेत नौकरी ।North Central Railway Recruitment 2021

    North Central Railway Recruitment 2021 : दहावी पास असणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी;दहावीच्या गुणांवर थेट रेल्वेत नौकरी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्लीः रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वे डीआरएम कार्यालय, झांसी यांनी अॅप्रेंटिस अधिनियम 1961 अन्वये अॅप्रेंटिस पदांसाठी विविध विभागांत भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली असून, 16 एप्रिल 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. North Central Railway Recruitment 2021

    उत्तर मध्य रेल्वे भरती 2021 च्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांत अॅप्रेंटिसची एकूण 480 पदे भरली जातील. रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा, याचा माहिती अधिसूचनेत दिलेली आहे.

    ज्या सर्व उमेदवारांनी दहावीची परीक्षा कमीत कमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि NCVT अधिकृत मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र घेतले असेल ते या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.



    अर्ज फी

    सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज फी 170 रुपये आहे, ज्यात 70 रुपये अर्ज शुल्क आणि जीएसटी समाविष्ट आहे. इतर सर्व (अनुसूचित जाती / जमाती / शारीरिक अपंग आणि महिला) उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

    निवड प्रक्रिया

    उत्तर मध्य रेल्वे अॅप्रेंटिस भरती 2021 साठी पात्र उमेदवारांची यादी गुणवत्ता यादीच्या आधारे जाहीर केली जाईल. या भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराला कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. दहावी किंवा आयटीआयमधील उमेदवारांनी मिळविलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

    अर्ज कसा करावा

    केवळ पात्र उमेदवार ऑनलाईन पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी mponline.gov.in वर नोंदणी करून अर्ज करावेत. उमेदवाराला सर्व तपशील एकाचवेळी भरावा लागतो. ऑनलाईन अर्जांच्या नोंदणीची अंतिम तारीख 16 एप्रिल 2021 आहे.

    North Central Railway Recruitment 2021

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार