स्वाती मालीवाल यांनी केजरीवालांना लिहिले पत्र No one in Delhi Commission for Women has been paid for 6 months Swati Maliwal wrote a letter to Kejriwal
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. मालीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, जेव्हापासून त्यांनी DCW चे अध्यक्षपद सोडले तेव्हापासून आयोगाकडून भेदभाव केला जात आहे.
केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात मालीवाल यांनी म्हटले आहे की, आयोगाच्या एकाही सदस्याला गेल्या ६ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही आणि त्याचे बजेटही कमी करण्यात आले आहे. या पत्राची माहिती स्वतः स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून दिली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राज्यसभा खासदार झालेल्या स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटद्वारे दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून दिल्ली सरकारच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आयोगाविरोधात आघाडी उघडली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून कुणालाही पगार मिळालेला नाही आणि बजेटमध्येही 28.5 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, अध्यक्ष आणि 2 सदस्यांची पदे भरण्यासाठी कोणतेही काम झालेले नाही. मी गेल्यापासून महिला आयोगाला पुन्हा कमकुवत संस्था बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्वाती मालीवाल यांनी पत्रात काय लिहिले?
स्वाती मालीवाल यांनी यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, 2015 पासून मी एवढ्या मेहनतीने उभारलेल्या यंत्रणांना सरकार नष्ट करू इच्छित आहे हे अत्यंत खेदजनक आहे. याशिवाय स्वाती मालीवाल यांनी आयोगाच्या कामांचाही आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. एकूण 4 पानांच्या पत्रात स्वाती मालीवाल यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर सविस्तर माहिती दिली आहे.
No one in Delhi Commission for Women has been paid for 6 months Swati Maliwal wrote a letter to Kejriwal
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया, म्हणाले- हायकमांडचा निर्णय…
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; गट ‘क’च्या रिक्त पदांची भरती MPSC मार्फत; पेपरफुटीचा कायदाही येणार
- अग्निवीराबाबत राहुल गांधींनी लोकसभेत चालविला नॅरेटिव्ह खोटा; पण शहीद अग्निवीराच्या वडिलांनी सांगितला मदतीचा आकडा!!
- ‘राहुल गांधींनी माफी मागावी… संपूर्ण संत समाज..’ ; स्वामी अवधेशानंद संतापले!