विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माझ्या नावावर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. जो कुणी कायद्याचं पालन करेल, काद्याच्या राज्यावर ज्याचा विश्वास असेल त्याला अत्यंत सन्मानाने आणि गौरवाने उत्तर प्रदेशमध्ये राहाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कुणी कायदाच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कुणीही असला तरी त्याच्यावर कायदा कारवाई करेल,No need to scare anyone in my name, Yogi Adityanath assured the Muslim community
असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.सामाजिक तेढ निर्माण करून त्यावर राजकीय पोळी भाजली जात असल्याचा आरोप करण्याच्या पार्श्वभूमीवर न्यूज अँकरनं योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या सरकारवर होत असलेल्या आरोपांविषयी विचारणा केली.
उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या नावाने मुस्लमिमांना घाबरवलं जातं, आम्हाला मत द्या नाहीतर योगी (आदित्यनाथ) येतील असं सांगितलं जात असल्याचं न्यूज अँकरनं म्हणताच योगी आदित्यनाथ यांनी त्यावर उत्तर दिले.
योगी आदित्यनाथ म्हणाले, जे कायदा पायदळी तुडवत होते, उत्तर प्रदेशमध्ये दंगली घडवत होते,
आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण झाले होते, व्यापाºयांसाठी धोका ठरले होते. उत्तर प्रदेशमधल्या लोकांना पळायला लावत होते त्यांच्यावरच गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून पळ काढण्याची वेळ आली आहे. जर कुणी याला जातिधमार्शी जोडू पाहात असेल, तर ते त्यांचं मत असेल. उत्तर प्रदेशच्या सामान्य रहिवाशांचे नाहीत.
No need to scare anyone in my name, Yogi Adityanath assured the Muslim community
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रपती रायगडावर हेलिकॉप्टरने नव्हे, रोपवेने येणार; शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखल्याबद्दल खा. संभाजीराजेंनी मानले आभार
- धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?
- आज मोदी, तर 16 डिसेंबरला राहुल गांधी उत्तराखंडच्या मोहिमेवर; 18 हजार कोटींच्या प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शिलान्यास
- कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल
- IND V/s NZ : एजाज पटेलने पटकावल्या सर्व १० विकेट, कुंबळेची केली बरोबरी, भारताच्या सिराजनेही किवी सलामीविरांना धाडले माघारी