• Download App
    ' काहीही झाले तरी मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही', अमित शाहांची इंफाळमध्ये घोषणा!No matter what happens Manipur will not be divided Amit Shah announced in Imphal

    ‘ काहीही झाले तरी मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही’, अमित शाहांची इंफाळमध्ये घोषणा!

    काही लोक घुसखोरी करून मणिपूरची लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही शाह म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरबाबत मोठी घोषणा केली आहे. काही लोक घुसखोरी करून मणिपूरची लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंफाळमध्ये सोमवारी केला. एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, काहीही झाले, कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मणिपूरचे विभाजन होऊ देणार नाही.’ No matter what happens Manipur will not be divided Amit Shah announced in Imphal


    ‘त्यांना जनतेची सेवा करण्यात नाही तर भ्रष्टाचारात रस’, गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल!


    शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये देशातील सर्व समुदायांना सोबत घेऊन आणि राज्याचे विभाजन न करता शांतता प्रस्थापित करणे हे नरेंद्र मोदी सरकारचे प्राधान्य आहे. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे सांगत नसले तरी त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर मोठी मागणी ठेवली – इनर लाइन परमिटशिवाय मणिपूर एकत्र राहू शकत नाही. भाजप सरकारने इनर लाईन परमिट देऊन मणिपूरला मजबूत केले आहे. जेव्हा ईशान्य आणि मणिपूरचे नशीब बदलेल तेव्हाच देशाचे नशीब बदलेल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

    मैतेई समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ गेल्या वर्षी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला होता. या वेळी राज्यात प्रचंड गोंधळ झाला, परिणामी मणिपूरमध्ये 3 मे रोजी झालेल्या जातीय संघर्षानंतर किमान 219 लोक मारले गेले.

    गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीमध्ये ‘उल्लेखनीय सुधारणा’ झाल्याचे म्हटले होते. गेल्या वर्षी संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या लोकांचे दुःख दूर करण्याची वचनबद्धता व्यक्त केली होती.

    No matter what happens Manipur will not be divided Amit Shah announced in Imphal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : मोदींनी स्वतःच्या विरोधातच घटना दुरुस्ती कायदा आणला, पंतप्रधान जेलमध्ये गेले, तर राजीनामा द्यावा लागेल, पण विरोधकांना जेलमधून सरकार चालवायचेय!!

    CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!