वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बुधवारी सांगितले की, निवडणुकीतील 5 गॅरंटींच्या अंमलबजावणीमुळे आर्थिक अडचणी असल्याने राज्यातील काँग्रेस सरकार या वर्षी विकास कामांसाठी कोणतीही तरतूद करू शकत नाही.No development works in Karnataka this year, all money to fulfill free announcements, reveals DK Shivakumar
शिवकुमार, जे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षदेखील आहेत, म्हणाले की, ज्या पक्षाच्या आमदारांना मोठ्या अपेक्षा आहेत, त्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि संयम राखावा. यासाठी प्रयत्न केले जातील. काही काँग्रेस आमदार नाराज असल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे की, ते त्यांच्या मतदारसंघात काम करू शकत नाहीयेत.
त्यांनी मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तसेच ते सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. तथापि, शिवकुमार आणि मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी काँग्रेसमधील अशी कोणतीही नाराजी असल्याची बाब नाकारली आहे.
शिवकुमार येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमदारांनी (विधिमंडळ पक्षाची) बैठक बोलावण्याची मागणी केली हे खरे आहे, आम्हालाही त्यांच्याशी काही आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, कारण आम्हाला 40,000 कोटी रुपये (गॅरंटींच्या अंमलबजावणीसाठी) बाजूला ठेवावे लागतील.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही या वर्षी विकासकामे करू शकणार नाही. आम्ही पैसा देऊ शकणार नाही पाटबंधारे विभाग किंवा पीडब्ल्यूडी विभागात, परंतु (आमदारांकडून) मोठी अपेक्षा आहे. आम्ही त्यांना थांबायला सांगितले आहे. आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांना परिस्थिती समजावून सांगू.”
शिवकुमार म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही अर्थसंकल्प तयार करताना हे सांगितले होते आणि त्यांनी मंत्र्यांना संयम बाळगण्यास सांगितले होते.
“मागील सरकारने दिवाळखोरी निर्माण केली होती, त्यांनी अधिक निविदा मागवून सरकारी तिजोरी रिकामी केली होती. पहिल्या वर्षीच गॅरंटींची अंमलबजावणी करून आम्ही आमची आश्वासने पूर्ण करण्याची हमी (काँग्रेस) घेतली आहे. या सर्वांनी (आमदारांनी) संयम राखला पाहिजे. तथापि, आपत्कालीन कामे निश्चितपणे हाती घेतली जातील, असेही ते म्हणाले. गुरुवारी संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.
No development works in Karnataka this year, all money to fulfill free announcements, reveals DK Shivakumar
महत्वाच्या बातम्या
- कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’
- द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा
- राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!
- भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!