• Download App
    नितीश कुमारांचे मंत्री जमा खान म्हणाले - मी भगवानसिंहचा वंशज आहे, पूर्वजांनी स्वीकारला होता इस्लाम । nitish kumars minister jama khan said i am a descendant of bhagwan singh ancestors had accepted islam

    धर्मांतराच्या प्रश्नावर नितीश कुमारांचे मंत्री जमा खान म्हणाले – मी मूळचा हिंदूच, पूर्वजांनी स्वीकारला होता इस्लाम !

    jama khan said i am a descendant of bhagwan singh : देशभरात धर्मांतरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि जेडीयू नेते जमा खान यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हाजीपूरमध्ये मंत्री खान म्हणाले की, त्यांचे पूर्वज राजपूत होते. पण त्यांनी इस्लाम स्वीकारला. यामुळे ते इस्लाम धर्म पाळत आहेत. त्यांचे काही नातेवाईक आहेत, जे अजूनही राजपूत आहेत आणि त्यांचेही त्यांच्याशी संबंध आहेत. nitish kumars minister jama khan said i am a descendant of bhagwan singh ancestors had accepted islam


    विशेष प्रतिनिधी

    हाजीपूर : देशभरात धर्मांतरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि जेडीयू नेते जमा खान यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हाजीपूरमध्ये मंत्री खान म्हणाले की, त्यांचे पूर्वज राजपूत होते. पण त्यांनी इस्लाम स्वीकारला. यामुळे ते इस्लाम धर्म पाळत आहेत. त्यांचे काही नातेवाईक आहेत, जे अजूनही राजपूत आहेत आणि त्यांचेही त्यांच्याशी संबंध आहेत.

    म्हणाले- धर्मांतर चुकीचे नाही

    बिहारमधील हाजीपूर गेलेले मंत्री जमा खान यांना धर्म परिवर्तनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की, कोणी स्वत:च्या इच्छेनुसार धर्मांतर केले तर ते चुकीचे नाही. पण जर कोणी पैशाचे आमिष देऊन जबरदस्तीने धर्मांतर केले तर ते चुकीचे आहे. असे कोणतेही प्रकरण समोर आले तर सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ते म्हणाले की, यावेळी मुस्लिमांनी जेडीयूला मतदान केले नाही. पण तरीही मुख्यमंत्री मुस्लिमांची काळजी घेतात.

    खान म्हणाले – मी मूळचा राजपूत!

    नितीश कुमार यांचे कॅबिनेट मंत्री जमा खान म्हणाले की, मी स्वत:देखील एक राजपूत होतो. आमचे पूर्वज जयरामसिंह आणि भगवानसिंह वैश्वबाडाहून आले होते. येथे एक लढाई सुरू होती त्यात त्यांचा पराभव झाला. यानंतर भगवानसिंह यांनी इस्लाम स्वीकारला आणि ते मुस्लिम बनले. पण आमचे इतर नातेवाईक, जे सरैंया गावचे आहेत, ते जयरामसिंह यांच्या कुटुंबातील असून राजपूत आहेत. आजही त्यांचा त्यांच्याशी संबंध आहे. म्हणूनच कोणी कोणालाही धर्म बदलण्यास भाग पाडू शकत नाही. जर असे कुठे घडले तर त्यासाठी पोलीस आणि कायदा आहे.

    nitish kumars minister jama khan said i am a descendant of bhagwan singh ancestors had accepted islam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रवींद्र चव्हाणांची खेळी पडली तोकडी; अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेनेच मारली बहुमताची बाजी!!

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले

    BMC Election 2026 : ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!