• Download App
    नितीश कुमारांची जाहीरपणे पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं Nitish Kumar publicly praised PM Modi

    नितीश कुमारांची जाहीरपणे पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

    शपथविधी सोहळा लवकरात लवकर करावा असेही म्हणाले. Nitish Kumar publicly praised PM Modi

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवार, ७ जून रोजी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आपले मत व्यक्त केले. नितीश कुमार यांनी केवळ पंतप्रधान मोदींप्रती आपली निष्ठा व्यक्त केली नाही, तर बिहार आणि देशाच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची वचनबद्धताही दर्शविली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बिहार आणि संपूर्ण देश झपाट्याने प्रगती करेल, असा विश्वास असल्याचे नितीश कुमार यांनी संसदेत स्पष्टपणे सांगितले.

    यावेळी बिहारच्या विविध प्रकल्पांचा आणि विकासकामांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, राज्यातील प्रलंबित कामे लवकरच पूर्ण केली जातील. जे अजूनही अपूर्ण आहे, तेही हे सरकार पूर्ण करेल, असे ते म्हणाले. तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू. आम्ही पूर्णपणे तुमच्यासोबत आहोत आणि एकत्र काम करू.

    नितीश कुमार पुढे म्हणाले की, “आम्हाला वाटते की तुम्ही पुढच्या वेळी याल, तेव्हा जे लोक इथे-तिथे जिंकले आहेत ते पुढच्या वेळी सर्व काही गमावतील.” आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत त्या लोकांनी कोणतेही काम केले नाही, देशाची सेवा केली नाही. तुम्ही खूप सेवा केलीत. त्यानंतर हा प्रकार घडला. या संधीनंतर पुढे काहीही होणार नाही, त्या लोकांना वाव राहणार नाही. ते सर्व गमावतील.

    यावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, शपथविधी सोहळा लवकरात लवकर आयोजित करण्यात यावा. ते म्हणाले, “तुमचा शपथविधी लवकरच सुरू व्हावा, जेणेकरून आपण सर्वांनी मिळून विकासाची नवी उंची गाठू शकू, अशी माझी नम्र विनंती आहे.” प्राप्त होऊन राज्यातील विकासाचा वेग आणखी वाढेल..

    Nitish Kumar publicly praised PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!