निज्जर हत्याकांडाचाही उल्लेख केला New India enters the house and kills Pakistan raised the issue in the UN
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : नवा भारत धोकादायक असल्याचे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात प्रथमच मान्य केले. संयुक्त राष्ट्रांचे कायमस्वरूपी राजदूत मुनीर अक्रम यांनी पुन्हा एकदा जागतिक मंचावर भारतावर आरोप करत ‘नवा भारत तुमच्या घरात घुसतो आणि तुम्हाला मारतो’ असे म्हटले आहे.
नुकत्याच एका अमेरिकन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत अक्रमने हे वक्तव्य केले असून, अक्रमने खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, परदेशी भूमीवर राहणाऱ्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानमध्ये अशाच प्रकारच्या टार्गेट किलिंगच्या घटना घडवून आणते.
2 मे रोजी झालेल्या आमसभेला संबोधित करताना अक्रम म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषद, महासचिव आणि महासभेच्या अध्यक्षांना भारताच्या पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगच्या मोहिमेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, हा दहशतवाद केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित नाही. कॅनडा, अमेरिका आणि शक्यतो इतर देशांमध्येही हा प्रयत्न सुरू आहे.
New India enters the house and kills Pakistan raised the issue in the UN
महत्वाच्या बातम्या
- अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, 4 आयसिस दहशतवादी पकडले, सर्व श्रीलंकेचे रहिवासी
- पीएम मोदी म्हणाले, भाजप अल्पसंख्याक विरोधात नाही; पण विशेष नागरिक कुणालाही मानणार नाही
- रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तासंघर्षाचा धोका; धर्मगुरू अन् लष्करात वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता
- सगळी मिथके तोडून भाजप दक्षिणेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरेल; पंतप्रधान मोदींना विश्वास!!