मतदारांना दिला हा खास संदेश, जाणून घ्या काय म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Dnyanesh Kumar देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मतदारांना संदेशही दिला. त्यांनी त्यांच्या संदेशात लिहिले की, ‘मतदान हे राष्ट्रसेवेच्या दिशेने पहिले पाऊल आहे. म्हणून, १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि मतदान केले पाहिजे. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी कायदे, त्याअंतर्गत जारी केलेले नियम आणि कायदे यांच्यानुसार. निवडणूक आयोग मतदारांसोबत होता, आहे आणि नेहमीच राहील.Dnyanesh Kumar
देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात, ते या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका, २०२६ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा, केरळ, तामिळनाडू विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सांभाळतील.
ज्ञानेश कुमार मार्च २०२४ पासून निवडणूक आयुक्त म्हणून काम करत होते आणि सोमवारी त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली. राजीव कुमार मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी, ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुखबीर सिंग संधू हे निवडणूक आयुक्त आहेत, तर विवेक जोशी यांची सोमवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
New Chief Election Commissioner Dnyanesh Kumar takes charge
महत्वाच्या बातम्या
- Ladaki Bahin scheme लाडकी बहीण लाभासाठी आता निकषांच्या चाळण्याच चाळण्या
- Bihar : दिल्लीनंतर बिहारमध्येही हादरे ; सिवानमध्ये ४.० तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले
- नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी नाही देता येत; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर प्रहार!!
- Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ कायद्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पावलाविरोधात आठवलेंची भूमिका