Friday, 9 May 2025
  • Download App
    PM Modi राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वासाठी तरुणांना तयार करण्याची गरज - पंतप्रधान मोदी

    PM Modi : राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वासाठी तरुणांना तयार करण्याची गरज – पंतप्रधान मोदी

    PM Modi

    आपल्या तरुणांनी राजकारणातही नेतृत्व करण्याची गरज आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे. PM Modi

    विशेष प्रतिनिधी

    गुजरातमधील रामकृष्ण मठात आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअली संबोधित केले. ते म्हणाले की, महान व्यक्तिमत्त्वांची ऊर्जा अनेक शतके जगात सकारात्मक सृजनाचा विस्तार करत राहते, म्हणूनच स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या जयंतीदिनी आपण अशा पवित्र कार्याचे साक्षीदार आहोत. लेखंबा येथील नवनिर्मित प्रार्थनागृह आणि साधू निवास भारताच्या संत परंपरेला पोषक ठरेल. PM Modi

    ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे आधुनिक विज्ञानाचे मोठे समर्थक होते. स्वामीजी म्हणायचे की विज्ञानाचे महत्त्व केवळ गोष्टी आणि घटनांचे वर्णन करण्यात नाही तर विज्ञानाचे महत्त्व आपल्याला प्रेरणा देण्यामध्ये आणि पुढे नेण्यात आहे.

    मोदी म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची वाढती ताकद, जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारताची नवीन ओळख, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे… आजचा भारत आपल्या ज्ञानावर आधारित आहे , तो वेगाने प्रगती करत आहे. आज आपण अमृतकालचा नवा प्रवास सुरू केला आहे, आपण ‘विकसित भारत’चा अटल संकल्प घेतला आहे, तो आपल्याला निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करायचा आहे.

    ते म्हणाले की, आज भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे. आज भारतातील तरुणांनी आपली क्षमता आणि सामर्थ जगभरात सिद्ध केले आहे. राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वासाठी तरुणांना तयार करण्याची गरज आहे. आज आपल्या तरुणांनी राजकारणातही नेतृत्व करण्याची गरज आहे. आता आम्ही राजकारण फक्त घराणेशाहीसाठी सोडू शकत नाही, त्यामुळे आम्ही नवीन वर्ष 2025 मध्ये नवीन सुरुवात करणार आहोत. PM Modi

    Need to prepare youth for leadership in every field of nation building PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील