Sunday, 11 May 2025
  • Download App
    Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभेत NC आमदार म्हणाले-

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेत NC आमदार म्हणाले- दहशतवादी बनायचे होते, लष्करी अधिकाऱ्याने व्यवस्थेवरचा विश्वास निर्माण केला

    Jammu and Kashmir

    Jammu and Kashmir

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : Jammu and Kashmir  जम्मू-काश्मीरच्या लोलाब विधानसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार कैसर जमशेद लोन विधानसभेत म्हणाले – मला आधी दहशतवादी बनायचे होते. खूप यातना सहन कराव्या लागल्या. 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी एलजी मनोज सिन्हा यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान लोन यांनी या गोष्टी सांगितल्या.Jammu and Kashmir

    कैसर यांनी सांगितले- मी 10वीत असताना माझ्या परिसरात एक दहशतवादी घटना घडली होती. यानंतर लष्कराने माझ्यासह 32 जणांची चौकशी केली. मी दहशतवाद्यांमध्ये असलेल्या एका तरुणाला ओळखत असल्याचे कबूल केले होते, कारण मी त्याच्या परिसरात राहत होतो.



    कैसर म्हणाले- माझ्या या उत्तरावर मला मारहाण करण्यात आली आणि दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मी घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. मी नाही असे उत्तर दिल्यावर मला आणखी मारहाण करण्यात आली. तेवढ्यात एक वरिष्ठ लष्करी अधिकारी तेथे आला. त्याने मला विचारले की मला काय बनायचे आहे, तर मी दहशतवादी म्हणालो.

    अधिकाऱ्याने याचे कारण विचारले असता मला खूप यातना सहन कराव्या लागल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांसमोर खडसावले. त्यांच्या या वागण्यानंतर माझा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा निर्माण झाला.

    कैसर जमशेद लोन पहिल्यांदाच आमदार झाले आहेत

    कैसर जमशेद लोन पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार दाऊद बशीत भट्ट यांचा 7871 मतांनी पराभव केला. कैसर यांना 19603 मते मिळाली. तर दाऊदला 11732 मते मिळाली.

    NC MLA in Jammu and Kashmir Legislative Assembly said- Wanted to become a terrorist

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार