प्रतिनिधी
नवी दिल्ली : Azadi ka Amrut Mahotstav लाल किल्ल्यावरून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. कदाचित नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असतील, की ज्यांची सावरकरांचे नाव लाल किल्ल्यावरून घेतले असेल!! Narendra Modi Speech red fort to ambedkar bose, bapu, savarkar
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचं मोलाचे योगदान आहे.आज महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस आहे. आज महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
महापुरुषांचे स्मरण करण्याचा दिवस
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच देशाच्या जडघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करून आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे. देशाने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे.
भारत हाच लोकशाहीचा जनक
भारत हाच लोकशाहीचा जनक आहे. लोकशाही काय असते हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. विविधता हिच भारताची शक्ती आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे.आज मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आहे. जब हम अपनी धरती से जुडेंगे, तभी तो ऊंचा उडेंगे!!
Narendra Modi Speech red fort to ambedkar bose, bapu, savarkar
महत्वाच्या बातम्या