• Download App
    Muslim League Iftar party रमजानचा महिना चालू असताना

    दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया + जया बच्चन + अखिलेशची “रिझर्व्ह” टेबलावर दिसली घट्ट मैत्री!!

    Muslim League

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रमजानचा महिना चालू असताना दिल्लीत रंगली मुस्लिम लीगची इफ्तार पार्टी; सोनिया गांधी, जया बच्चन, अखिलेश यांची “रिझर्व्ह” टेबलवर दिसली घट्ट मैत्री!!Muslim League Iftar party held in Delhi Sonia Jaya Bachchan Akhilesh close friendship was seen at the reserved table!!

    त्याचे झाले असे :

    इंडियन नॅशनल मुस्लिम लीगने आज राजधानी नवी दिल्ली इफ्तार पार्टी दिली. मुस्लिम लीगने मागितलेले पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर देखील त्या पक्षाचे भारतात अस्तित्व उरलेच. ते केरळमध्ये वाढत गेले. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर मुस्लिम लीगने इंडियन नॅशनल मुस्लिम लीग असे नवे नाव धारण केले. त्या पक्षाचे वर्षानुवर्षे केरळमधून खासदार आणि आमदार निवडून आले.



     

    त्याच इंडियन नॅशनल मुस्लिम लीगने आज इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत पाहुण्यांच्या काही टेबल मुद्दामून रिझर्व्ह ठेवली होती. त्यातल्या स्पेशल रिझर्व्ह टेबलावर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी एकाच गप्पा मारत वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले.

    एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती करणारे केरळ मधले काँग्रेसचे खासदार शशी थरूर या पार्टीत सामील झाले होते. त्यांनी इंडियन नॅशनल मुस्लिम लीगचे राजकीय महत्त्व अधोरेखित करून सांगितले. इंडियन नॅशनल मुस्लिम लीगचे केरळमध्ये मोठे संघटन आहे. काँग्रेस बरोबर त्या पक्षाची युती आहे. त्या पक्षाचे अनेक खासदार आणि राज्यसभेत निवडून आलेत. आम्ही सगळेजण मुस्लिम लीगच्या नेत्यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा द्यायला इफ्तार पार्टीला आलो आहोत, असे शशी थरूर म्हणाले.

    Muslim League Iftar party held in Delhi Sonia Jaya Bachchan Akhilesh close friendship was seen at the reserved table

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार