वृत्तसंस्था
मुंबई : Major Accident मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांच्या पंखांची धडक झाली असून यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेने विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.Major Accident
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गर्दीच्या वेळी टॅक्सीवेवर घडली, ज्यात प्रवाशांनी भरलेल्या दोन लहान विमानांचा समावेश होता. विमानतळ सूत्रांनुसार, गर्दीच्या धावपट्टीवरून मार्गक्रमण करत असताना दोन्ही विमानांचे पंखांचे टोक एकमेकांना घासले गेले. यात पंखांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले आहे.Major Accident
अधिकची माहिती अशी की, यातील एअर इंडिया AI 2732 हे विमान मुंबईहून कोईम्बतूरसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत होते. विमान प्रस्थानासाठी आपल्या गेटवरून ते पुढे जात होते. तर इंडिगो 6E791 हे विमान हैदराबादहून आले होते. सुरक्षित लँडिंगनंतर विमान आपल्या निर्धारित पार्किंग बेकडे जात होते. याच वेळी दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले.
डीजीसीएकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या घटनेची दखल घेतली असून, औपचारिक चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही विमान कंपन्यांनी नियामक प्राधिकरणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे दुजोरा दिला आहे.
Major Accident Averted at Mumbai Airport as Air India and IndiGo Planes Collide
महत्वाच्या बातम्या
- जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा प्रचाराचा धडाका; मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीचा काढला एक्का!!
- विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!
- भारत – अमेरिका मुक्त व्यापार करार मैत्रीचा एक नवीन अध्याय!!; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक
- Indus Waters : भारत सिंधू जल कराराच्या सुनावणीत सहभागी होणार नाही; म्हटले- हे न्यायालय अवैध आहे, याचे आदेश मानत नाही