• Download App
    Morne Morkel 'BCCI'ने दक्षिण आफ्रिकेच्या 'या' दिग्गज

    Morne Morkel : ‘BCCI’ने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला बनवलं ‘टीम इंडिया’चा नवा गोलंदाज प्रशिक्षक!

    Morne Morkel

    खुद्द जय शाह यांनी एका क्रिकेट वेबसाईटला ही माहिती दिली.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची ( Morne Morkel )टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मॉर्नी मॉर्केल पदभार स्वीकारणार आहे.

    खुद्द जय शाह यांनी एका क्रिकेट वेबसाईटला ही माहिती दिली. याशिवाय टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही यापूर्वी बीसीसीआयला गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी मॉर्केलच्या नावाचा विचार करण्याची विनंती केली होती.



    आयपीएल दरम्यान गंभीर आणि मॉर्केलमध्ये चांगले संबंध होते. खरंतर दोघेही लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होते आणि एकत्र खेळत होते. अशा स्थितीत गंभीरने बीसीसीआयला मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनविण्याचा विचार करण्याची विनंती केली होती.

    मॉर्नी मॉर्केलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. याआधी त्यांनी पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. आता तो टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावणार आहे.

    मॉर्नी मॉर्केलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

    जर आपण मॉर्नी मॉर्केलच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 309 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 47 विकेट घेतल्या आहेत. आता त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    Morne Morkel as the new bowling coach of Team India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे