• Download App
    मोहब्बत की दुकान में नफरत की तस्करी; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर असदुद्दीन ओवैसींची टीका|Mohabbat ki shop mein Hate ki Smugka; Asaduddin Owaisi criticizes Congress leader Kamal Nath

    मोहब्बत की दुकान में नफरत की तस्करी; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर असदुद्दीन ओवैसींची टीका

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या हिंदु राष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. मोहब्बत की दुकान में नफरत की तस्करी सुरू असल्याचे ओवेसी म्हणाले.Mohabbat ki shop mein Hate ki Smugka; Asaduddin Owaisi criticizes Congress leader Kamal Nath

    खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, “काँग्रेसचे मध्य प्रदेशातील ‘दिग्गज’ नेते स्पष्टपणे सांगत आहेत की मोहन भागवत जे म्हणतात ते भारत हिंदू राष्ट्र आहे. भारत हा केवळ एका समुदायाचा देश नाही. भारत हे कधीच हिंदू राष्ट्र नव्हते, नाही आणि राहणारही नाही. ‘मोहब्बत की दुकान’ में नफरतची तस्करी होत आहे. इतरांना बी-टीम म्हणून लेबल लावण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? उद्या भाजपचा पराभव झाला तरी हा द्वेष कमी होईल का?



    खरे तर काँग्रेस नेते राहुल गांधी हल्ली सांगत आहेत की, आम्ही नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान उघडले आहे. भारत जोडो यात्रेतही त्यांनी याचा उल्लेख केला होता. दुसरीकडे, काँग्रेस ओवेसींच्या पक्ष एआयएमआयएमला भाजपची बी टीम म्हणत आहे.

    काय म्हणाले होते कमलनाथ?

    कमलनाथ यांना सोमवारी (7 ऑगस्ट) विचारण्यात आले की बागेश्वर धाम महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या विधानाचे ते समर्थन करतात का? यावर ते म्हणाले, प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. आज 82 टक्के लोक हिंदू आहेत, मग हे कोणते राष्ट्र आहे? मात्र, मी धर्मनिरपेक्ष आहे, असेही ते पुढे म्हणाले होते.

    Mohabbat ki shop mein Hate ki Smugka; Asaduddin Owaisi criticizes Congress leader Kamal Nath

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे