विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज अखेर संपला. तब्बल 7 टप्प्यांमध्ये चाललेल्या या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 180 जाहीर सभांमध्ये भाषणे केली. 80 मुलाखती दिल्या. 60 पेक्षा जास्त संमेलने केली.Modi use the words “Modi”, “Hindu – Muslim”, “Temple” in his 15 days of campaign speeches??, counted by Congress president!!
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी नेमके किती प्रचार सभांमध्ये भाषणे केली??, किती मुलाखती दिल्या?? याचा आकडा काँग्रेसने अद्याप जाहीर केलेला नाही.
परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 15 दिवसांच्या प्रचारांच्या भाषणामध्ये कोणते शब्द नेमके किती वेळा वापरले??, याची आकडेवारीच आज सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा स्तर खालावला. त्यांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली. त्यांनी हेट स्पीच केली, वगैरे नेहमीचे आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेच, पण या आरोपांच्या पुष्ट्यर्थ खर्गे यांनी मोदींनी नेमके कोणते शब्द किती वेळा वापरले??, याची जंत्री दिली.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मोजणीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील शब्द “इतक्या” वेळा वापरले :
मोदी 758, मंदिर 421, मुस्लिम – पाकिस्तान – मायनॉरिटीज 224, इंडी गठबंधन 573, काँग्रेस 232!! पण मोदींनी आपल्या भाषणामध्ये एकदाही बेरोजगारी, महागाई हे शब्द उच्चारले नाहीत. असा आरोप खर्गे यांनी केला.
स्वामी विवेकानंदांच्या खडकावर बसून किंवा गंगेत – समुद्रात डुबकी मारून महात्मा गांधी समजणार नाहीत. त्यासाठी महात्मा गांधींचा अभ्यास करावा लागेल, असा टोमणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना हाणला.
देशात इंडी आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला, पण काँग्रेसला लोकसभेच्या किती जागा मिळतील?? त्यानंतर नेतेपदी कोण असेल??, पंतप्रधान कोण होईल??, या प्रश्नांची उत्तरे मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली नाहीत.
Modi use the words “Modi”, “Hindu – Muslim”, “Temple” in his 15 days of campaign speeches??, counted by Congress president!!
महत्वाच्या बातम्या
- युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना पुतीन यांचा इशारा; ज्या देशाच्या शस्त्रांनी हल्ला, ते गंभीर परिणाम भोगतील
- काशीमध्ये लोकांचा उत्साह प्रचंड; मोदींच्या दिग्विजयात मराठी माणूस भागीदार : देवेंद्र फडणवीस
- मी नार्को टेस्ट क्लियर केली तर अंजली दमानिया घरी बसतील का??; अजितदादांचे प्रतिआव्हान!!
- सांगलीत भीषण दुर्घटना! कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू