• Download App
    मोदींचा दोन दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारचा दौरा करणार!|Modi to visit Uttar Pradesh and Bihar for two days

    मोदींचा दोन दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारचा दौरा करणार!

    काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर नालंदा विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन करणार


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच उत्तर प्रदेश आणि बिहारला 18 जून रोजी भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करतील आणि नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही करतील. निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच आपल्या लोकसभा मतदारसंघात पोहोचत आहेत.Modi to visit Uttar Pradesh and Bihar for two days



    वाराणसीत दुपारी 4.15 वाजता किसान सन्मान संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान संध्याकाळी 6.15 वाजता काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा करतील. 18 तारखेला वाराणसीमध्ये रात्रीचा मुक्काम केल्यानंतर पंतप्रधान 19 तारखेला दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्ये सहभागी होतील. सकाळी 10 वाजता बिहारमधील नालंदा विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन करतील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसी दौऱ्यात 50 हजार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपचे वाराणसी प्रदेश प्रमुख दिलीप पटेल यांनी ही माहिती दिली. मेहदीगंज परिसरातील शेतकरी परिषदेच्या ठिकाणी मोदी 21 शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या भेटतील आणि त्यांची कृषी उत्पादनेही पाहतील. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी करतील.

    हर-हर महादेवच्या जयघोषात पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचे काशी प्रदेश भाजपचे अध्यक्ष पटेल यांनी सांगितले. दुर्गम खेड्यातील शेतकरी बस, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांतून परिषदेला पोहोचणार आहेत, तर आजूबाजूच्या भागातील शेतकरी ढोल-ताशांसह पायी चालत शेतकरी परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

    Modi to visit Uttar Pradesh and Bihar for two days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार