• Download App
    मोदींनी 3 तास रोखले होते रशिया-युक्रेन युद्ध : माजी केंद्रीय मंत्र्यांचा दावा - पुतीन यांनी मोदींचा शब्द पाळला, म्हणून भारतीय विद्यार्थी सुखरूप आले|Modi had stopped Russia-Ukraine war for 3 hours: Former Union Minister claims - Putin obeyed PM, then Indian students came out safe

    मोदींनी 3 तास रोखले होते रशिया-युक्रेन युद्ध : माजी केंद्रीय मंत्र्यांचा दावा – पुतीन यांनी मोदींचा शब्द पाळला, म्हणून भारतीय विद्यार्थी सुखरूप आले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवले. त्यादरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी पाटण्यात हा दावा केला. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Modi had stopped Russia-Ukraine war for 3 hours: Former Union Minister claims – Putin obeyed PM, then Indian students came out safe

    ते म्हणाले, ‘हा स्वाभिमानी आणि सुरक्षित भारत आहे.’ प्रसाद म्हणाले, ‘370 मुळे काश्मीरमध्ये भारतीय कायदा लागू होत नव्हता. हाताने सफाई करणाऱ्या कामगारांना लागू असलेला शिक्षणाचा कायदा लागू होत नव्हता. ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळाला नव्हता. आता भारत सरकारच्या कार्यालयात दलालांनी येणे बंद केले आहे.



    चीन चिडू नये म्हणून लडाखमध्ये रस्ते बांधले जात नव्हते

    ते म्हणाले, ‘लडाखमध्ये रस्ता बनू दिला जात नव्हता. गावात रस्ता तयार होताच चीन रोखायचा. दिल्लीतून सूचना आहे, चीनला छेडू नका, असे सांगण्यात यायचे. संसदेत हा प्रश्‍न उपस्थित झाल्यावर लोक रोखू लागले. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, चीनने चिडण्याची गरज नाही. आज काश्मीर, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या प्रत्येक भागात सीमेवर रस्ते बांधले जात आहेत.

    उपेक्षित महापुरुषांना मान मिळाला

    ते म्हणाले, ‘सरदार पटेल यांचा आज जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा विसर पडला होता. त्यांचा पुतळा आता राजपथावर बसवला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाच तीर्थक्षेत्रांना विकसित करण्यात आले.

    रशिया-युक्रेन युद्धाला 103 दिवस पूर्ण

    दरम्यान, शुक्रवारी रशिया-युक्रेन युद्धाला 103 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात युक्रेनच्या रस्त्यांवर रक्ताच्या नद्या वाहू लागल्या आहेत. हे शतकातील सर्वात मोठे मानवी संकट असल्याचे मानले जाते. युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स कौन्सिलनुसार, या युद्धात सुमारे 68 लाख लोकांनी देश सोडला आहे. त्याच वेळी, देशातील 80 लाख लोकांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून सतत युद्ध सुरू आहे.

    Modi had stopped Russia-Ukraine war for 3 hours: Former Union Minister claims – Putin obeyed PM, then Indian students came out safe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र