• Download App
    युक्रेनचे युद्ध रोखायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही : मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्र्यांची मागणी; मोदी, पोप, गुटेरस यांची समिती करण्याची शिफारस|Mexico's foreign minister demands; Modi, Pope, Guterres committee recommended To Stop Ukrain War

    युक्रेनचे युद्ध रोखायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही : मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्र्यांची मागणी; मोदी, पोप, गुटेरस यांची समिती करण्याची शिफारस

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनंतर आता मेक्सिकोनेही रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे म्हटले आहे. मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो लुइस एब्रार्ड कासौबोन यांनी संयुक्त राष्ट्रांत सांगितले की, रशिया-युक्रेन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समिती स्थापन केली जावी. या समितीत नरेंद्र मोदी, व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिस व युनोचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना सहभागी केले पाहिजे.Mexico’s foreign minister demands; Modi, Pope, Guterres committee recommended To Stop Ukrain War



    कासोबोन म्हणाले, मी अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅनुएल लोपेझ ओब्राडोर यांच्या वतीने प्रस्ताव मांडतो की, युक्रेन वाटाघाटी व शांतता समितीची स्थापना केली जावी. या समितीचे उद्दिष्ट चर्चेसाठी नवे तंत्र बनवणे, उभय देशांत विश्वास कायम ठेवणे आणि शांततेचा कायमस्वरूपी मार्ग उघडणे हे असले पाहिजे.

    मोदी यांनी समरकंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सध्याचा काळ युद्धाचा नसल्याचे म्हटले होते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सने याचे स्वागत केले आहे.

    Mexico’s foreign minister demands; Modi, Pope, Guterres committee recommended To Stop Ukrain War

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे