या निर्णयाचे राजकीय नेतेमंडळींसह, साहित्य, कला अशा सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. Modi government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मोठी भेट दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने आज सर्वात मोठा निर्णय जाहीर केला असल्याचं बोललं जात आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राजकीय नेतेमंडळींसह, साहित्य, कला अशा सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. शिवाय प्रत्येक मराठी माणूस या निर्णयामुळे आनंदला आहे. केवळ महाराष्ट्रतीलच नाही तर जगभरातील मराठी बांधवांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी, प्राकृत भाषेला अभिजात दर्जा बहाल केला आहे.
अनेक वर्षांपासून सगळ्याच राजकीय पक्षांची तसेच मराठी एकीकरण समिती असणाऱ्या सगळ्यांची मागणी होती की, मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा. त्यानंतर केंद्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय़ जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांसह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लढत असणाऱ्या सर्वच संघटनांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
Marathi has been given the status of classical language by the Modi government
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : पंतप्रधान मोदींचे नीरज चोप्राच्या आईला पत्र; चुरमा पाठवल्याबद्दल आभार, ते खाऊन भावुक झालो!
- Congress strike : लोकसभेतील स्ट्राईक रेटच्या बळावर काँग्रेसने अखेर ठाकरे + पवारांना मागे रेटलेच!!
- Thailand : थायलंडमध्ये स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू, टायर फुटल्याने अपघात; 5 शिक्षकांसह 44 जण होते स्वार
- Pawar NCP : एरवी सनातन धर्मावर टीकाटिप्पणी, पण आता नवरात्राच्या 9 दिवसांचा पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनासाठी वापर!!