• Download App
    Manipur मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जिरीबाममध्ये 5 ठार

    Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जिरीबाममध्ये 5 ठार; इंफाळमध्ये मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयावर जमावाचा हल्ला

    वृत्तसंस्था

    इंफाळ : Manipur मणिपूरमध्ये शनिवारी (7 सप्टेंबर) पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी एका वृद्धाची झोपेत असताना डोक्यात गोळी झाडून बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. जिरीबामच्या डोंगराळ भागात दोन समुदायांमध्ये गोळीबार झाला. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. Manipur

    दुसरीकडे, रात्री उशिरा जमावाने इंफाळ पश्चिम आणि इम्फाळ पूर्व येथील मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयावर हल्ला केला. संतप्त जमावाला सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घ्यायची होती. सीआरपीएफ जवानांसह पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी पेलेट गनमधून अनेक राऊंड फायर केले. मॉक बॉम्ब आणि अश्रुधुराचे शेलही डागण्यात आले.

    सुरक्षा दल आणि जमाव यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू होता. तर ५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना जेएनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत शस्त्रे किंवा दारूगोळा लुटल्याची पुष्टी मिळालेली नाही. मात्र, दोन्ही ठिकाणच्या हिंसाचारात मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.

    ताज्या हिंसाचारानंतर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत

    राज्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मणिपूर इंटिग्रिटी (COCOMI) समितीने कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ बंद आणि सार्वजनिक कर्फ्यूची हाक दिली आहे. सकाळपासून इंफाळमधील सर्व दुकाने बंद आहेत. रस्ते आणि बाजारपेठा सुनसान आहेत.

    Manipur Violence resumes in , 5 killed in Jiribam

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Indore High Court : मध्यप्रदेशातील 75 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा होणार; इंदूर हायकोर्टाचा NTA ला आदेश

    Kolkata Law College : कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण : दोन दिवस आधीच रचला होता कट, आरोपींची योजना तपासात उघड

    JNU Najeeb Ahmed Case : JNUचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदचा खटला बंद; दिल्ली कोर्टाने म्हटले- CBIला दोष देता येणार नाही, त्यांनी सर्व पर्याय वापरले