• Download App
    Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावर पार पडली १८ राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी! Manipur Violence  Long meeting of 18 political parties held on Manipur violence Demand to implement Presidents rule

    Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावर पार पडली १८ राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी!

    काँग्रेससह दहा पक्ष मणिपूरवर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. सरकारच्यावतीने विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली आणि हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. Manipur Violence  Long meeting of 18 political parties held on Manipur violence Demand to implement Presidents rule

    दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत समाजवादी पार्टीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

    या बैठकीला भाजपसह १८ राजकीय पक्ष आणि ईशान्येतील चार खासदार आणि ईशान्येचे दोन मुख्यमंत्री उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा आणि आरजेडीने बैठकीत मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचवेळी द्रमुकने महिला आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर लोकांना वेगळे करण्यासाठी बळाचा वापर करू नये, अशी सूचना काँग्रेसने केली.

    बैठकीनंतर गृह मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात अमित शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी संवेदनशीलतेने आणि राजकीयदृष्ट्या त्यांच्या सूचना दिल्या आणि भारत सरकार या सूचनांचा खुल्या मनाने विचार करेल.

    खरे तर मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून विरोधक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. काँग्रेससह 10 पक्ष मणिपूरवर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. या पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी भेटीची वेळ मागितली होती. यानंतर सर्व पक्षांनी मिळून मणिपूरवर निवेदन दिले. या सगळ्या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली. बैठकीत गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मणिपूरमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले.

    Manipur Violence  Long meeting of 18 political parties held on Manipur violence Demand to implement Presidents rule

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!