वृत्तसंस्था
इंफाळ : Manipur Tragedy मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात काही अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा दोन मुले आणि त्यांची आई त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. आई जखमी झाली आहे.Manipur Tragedy
स्थानिक लोकांनी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी आंदोलन केले. परिसरात एका पेट्रोल पंपाजवळ दोन ऑइल टँकर आणि एका ट्रकला आग लावली. त्यांनी मोइरांग पोलीस ठाण्यासमोर टायर जाळले आणि एक पोलीस चौकी तोडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.Manipur Tragedy
मंगळवारी सकाळी मोइरांगमध्ये तणाव वाढला. संतप्त तरुण आणि महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर टायर जाळून रस्ता रोखून धरला. एका पेट्रोल पंपाजवळ तेलाचे २ टँकर आणि एका ट्रकलाही आग लावली. नागरिकांनी ट्रोंग्लाओबी येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला. राज्याचे गृहमंत्री गोविंददास कोंथौजम यांनी सांगितले की, संतप्त जमावाने कॅम्पमधील अनेक गाड्या जाळल्या आणि तोडफोड केली.
प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला, ज्यामध्ये २ आंदोलकांचा मृत्यू झाला आणि २५ जण जखमी झाले. सरकारने खोऱ्यातील ४ जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंग यांनी दोन मुलांच्या मृत्यूच्या घटनेची चौकशी ‘एनआयए’मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जिल्ह्यांत ३ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसेनंतर आतापर्यंत २६० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.
आईसोबत झोपले होते दोन्ही चिमुकले
रॉकेट हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे वडील बिहारमध्ये तैनात आहेत. गावात ही मुले आई आणि आजोबांसोबत राहत होती. आजोबांनी सांगितले की, गेल्या २ दिवसांपासून गोळीबार सुरू होता, त्यामुळे कुटुंब दहशतीखाली होते. सून आणि मुले झोपलीच होती. त्यानंतर ५-७ मिनिटांतच रॉकेटने बेडरूमची भिंत तोडली. दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.
Manipur Tragedy: 2 Children Killed in Bishnupur Bomb Attack; NIA to Probe
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला मिळणार स्वतंत्र AI विभाग; फडणवीस सरकार स्थापन करणार नवे आयुक्तालय!!
- पार्थचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!
- महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना, भांडवली बाजारात सूचीबद्धतेचा फडणवीस सरकारचा निर्णय
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना फटकारले; तपास NIA कडे