• Download App
    लसपुरवठ्यावरून ममतादीदी भडकल्या, पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार |Mammatadidi wrote letter to PM Modi

    लसपुरवठ्यावरून ममतादीदी भडकल्या, पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार

     

    कोलकता – पश्चि म बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा कोरोना लशीच्या टंचाईबाबत केंद्राकडे तक्रार केली आहे. कमी लसीबद्दल दीदी भडकल्या असून यासाठी त्यांनी केद्राला जबाबदार धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले असून लशीचा पुरवठा वाढवला नाही तर बंगालची स्थिती गंभीर होवू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.Mammatadidi wrote letter to PM Modi

    बंगालमधील प्रत्येक बाबीकडे आता राजकारणाच्या चष्म्यातूनच पाहिले जात आहे. त्यामुळे ममतादिदींच्या ताज्या पत्रालाही राजकीय किनार असल्याचे मानले जाते. राज्यातील लसीकरणाचा सारा मामला केंद्रावर ढकलण्याचा दीदींचा डाव आहे.



    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालला सुमारे चौदा कोटी डोसची गरज असल्याचे नमूद केले आहे. राज्यात आतापर्यंत १५,३०,८५० जणांना कोरोनाची लागण झाली तर १८,१८० जणांचा मृत्यू झाला आहे.

    प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेनुसार पश्चिजम बंगालमधील सुमारे ९.५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अर्जाचा पुनर्विचार करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.

    Mammatadidi wrote letter to PM Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न