• Download App
    Mamatha Banerjee ममता बॅनर्जींचा डाव त्यांच्याच तोंडून उघड; भारताने हाकललेल्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल मध्ये आणताहेत परत!!

    Mamatha Banerjee ममता बॅनर्जींचा डाव त्यांच्याच तोंडून उघड; भारताने हाकललेल्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल मध्ये आणताहेत परत!!

    नाशिक : ममता बॅनर्जी यांचा डाव त्यांच्याच तोंडून उघड; भारताने हाकललेल्या बांगलादेशी घुसखोरांना बंगाली म्हणून पश्चिम बंगाल मध्ये आणत आहेत परत!!, असे खरंच घडते आहे. Mamatha Banerjee

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी कोंबिंग ऑपरेशन करून आपापल्या राज्यांमध्ये घुसलेले पाकिस्तानी आणि बांगलादेशी हुडकून काढले. त्यांना सरकारी खर्चाने त्यांच्याच देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधून हजारो बांगलादेशींना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्या बांगलादेशी घुसखोरांचा पुळका आला. आणि त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालचे रहिवासी म्हणून आपल्या राज्यात परत घ्यायला सुरुवात केली. अशा 300 ते 400 केसेस राजस्थानमधून आढळल्याचे त्यांनी स्वतःच कबूल केले. राजस्थान सरकारने तेवढ्या बांगलादेशींना राजस्थान मधून हाकलून दिले, पण ममता बॅनर्जी यांनी ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत, असे सांगून बांगलादेशातून परत बोलवून घेतले. Mamatha Banerjee



    2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धोकादायक खेळ ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये चालविला. बांगलादेशी मुसलमान हा प्रामुख्याने ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसची व्होट बँक आहे. त्यामुळे बांगलादेशी मुसलमानांना पश्चिम बंगालच्या सीमावर्ती राज्यांमध्ये जास्तीत जास्त रिचवायचा प्रकार ममता बॅनर्जींनी केला. त्याचाच एक भाग म्हणून ममतांनी बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालचे नागरिक असल्याचे लेबल लावले. पश्चिम बंगालच्या नागरिकांना बांगलादेशी लेबल लावू नका, असे सांगत victim card खेळले. ते केवळ बंगाली बोलतात म्हणून ते बांगलादेशी नागरिक ठरत नाहीत. ते पश्चिम बंगाल मधून इतर राज्यांमध्ये कामासाठी जातात. ते बांगलादेशी नागरिक नाहीत. ते भारताचे नागरिक आहेत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

    – व्होट बँक पक्की करण्याचा डाव

    पण असा दावा करून ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसची व्होट बँकच पक्की केली. कारण ज्या राज्यांनी बांगलादेशी घुसखोरांना आपल्या राज्यातून बाहेर काढले. त्यांना बांगलादेशात पाठवून दिले, त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या रस्तेमार्गांचा अवलंब केला. अर्थातच पश्चिम बंगालच्या सरकारला त्या घुसखोरांना बंगाली नागरिक म्हणून लेबल लावायाची संधी मिळाली. त्यांनी ती संधी पुरेपूर वसूल केली, पण हा प्रकार जास्त चालवता येणार नाही, हे लक्षात येताच ममता बॅनर्जींनी victim card खेळून भाजपवरच शरसंधान साधले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये घुसलेल्या बांगलादेशी नागरिकांना तिथून बाहेरच काढू नये यासाठी धर्मनिरपेक्षतेचे अकांडतांडव चालविले. भारत हा सर्व धर्मीयांचा देश आहे. इथे कोणालाही धर्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. बंगाली नागरिकांना बांगलादेशी घुसखोर म्हणून हाकलून देता येणार नाही, अशा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

    Mamatha Banerjee taking back Bangladeshi intruders into West Bengal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Netanyahu : इस्रायलने युद्धबंदीवर मौन सोडले, नेतन्याहू म्हणाले इराणने आता जर उल्लंघन केले, तर…

    Air India : मध्य पूर्वेतील युद्धाचा हवाई सेवांवर परिणाम; कतारचे पूर्णपणे हवाई क्षेत्र बंद!

    Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांनी अरब देशांना दिला इशारा अन् केला ‘हा’ मोठा दावा