शिवराज सिंह चौहान यांनी नांदेडमध्ये शेतकऱ्यांशी केलेल्या संभाषणानंतर हा आदेश काढण्यात आला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ( farmers ) आनंदाची बातमी आणली आहे. केंद्र सरकारने शनिवारी विमा कंपन्यांना महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांचे 225 कोटी रुपयांपर्यंतचे प्रलंबित दावे आठवडाभरात भरण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 21 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये शेतकऱ्यांशी केलेल्या संभाषणानंतर हा आदेश काढण्यात आला आहे, जेथे सोयाबीन पीक विमा दाव्यांचे प्रलंबित मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
22 ऑगस्ट रोजी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची (TAC) बैठक घेतली. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, समितीने पीक कापणी प्रयोगांवरील विमा कंपनीचे आक्षेप नाकारले आणि प्रलंबित दाव्यांची निपटारा करण्याचे आदेश दिले.
निवेदनात विमा कंपनीचे नाव उघड करण्यात आले नाही. केंद्रीय TAC ने शनिवारी विमा कंपनीला सात दिवसांच्या आत थकबाकी भरण्याचे औपचारिक आदेश जारी केले. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून, ज्यांचे पेमेंट 200 ते 225 कोटी रुपयांदरम्यान होणार आहे.
Good news for the farmers of Maharashtra central government has directed to pay Rs 225 crore
महत्वाच्या बातम्या
- Sunita Williams : सुनीता विल्यम्सबद्दल मोठी बातमी, NASA ने सांगितले अवकाशातून कधी परतणार?
- Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक अस्वस्थ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- देशभरात BNSचे कलम 479 लागू करा, शिक्षेचा एक तृतीयांश काळ भोगलेल्या अंडरट्रायल कैद्याला जामिनाची तरतूद
- Ajit Pawar : मुलींवर हात टाकणाऱ्या विकृताचे सामानच काढले पाहिजे; यवतमाळच्या लाडकी बहीण मेळाव्यात