विश्व हिंदू परिषदेने केली अटकेची मागणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jaya Bachchans समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभावर केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. संसदेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, देशात कुठेही सर्वात जास्त प्रदूषित पाणी असेल तर ते कुंभमेळ्यात आहे. त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही.Jaya Bachchans
त्या म्हणाल्या की महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मृतदेह गंगा नदीत विसर्जित करण्यात आले. हेच पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे. यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. देशाचे खरे प्रश्न कोणीही उपस्थित करत नाही. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन पुढे म्हणाल्या की, महाकुंभात व्हीआयपी लोकांना स्पेशल वागणूक दिली जात आहे.
तर सर्वसामान्य लोकांची कोणीही पर्वा करत नाही. त्यांना कोणतीही व्हीआयपी वागणूक मिळत नाही. व्हीआयपी येतात, आंघोळ करतात आणि निघून जातात. त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात. महाकुंभात सामान्य माणसाला कोणतीही मदत नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कुंभमेळ्यात काय घडले ते सभागृहाला सांगावे.
Mahakumbha water is most polluted bodies were thrown away Jaya Bachchans statement creates confusion
महत्वाच्या बातम्या
- Ravi Shankar महाकुंभातील चेंगराचेंगरी हे एक षड्यंत्र! भाजप खासदार रविशंकर यांचा संसदेत दावा
- Talkatora Stadium आता दिल्लीच्या ‘तालकटोरा स्टेडियम’चे नाव बदलणार!
- Ayodhya : अयोध्येत दलित तरुणीवर अत्याचार; डोळे फोडले:3 दिवस बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
- गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकरांचा नाशिक मध्ये गुरुवारी भव्य सन्मान सोहळा!!