Lockdown in Delhi : राजधानी दिल्लीतील संसर्गाचा दर कमी होत असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हे लॉकडाऊन 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील. याकाळात दिल्लीतली मेट्रोसेवा बंदच राहणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली आहे. Lockdown in Delhi escalates by a week, announces Chief Minister Arvind Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील संसर्गाचा दर कमी होत असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हे लॉकडाऊन 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील. याकाळात दिल्लीतली मेट्रोसेवा बंदच राहणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली आहे.
दिल्लीचे लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्यात येत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, गेल्या 24 तासांत कोरोनाचे जवळपास 6,500 रुग्ण आढळले आहेत. सकारात्मकतेचा दर 1 टक्क्याने कमी होऊन 10 टक्क्यांच्या जवळ आला आहे.
दरम्यान, दिल्लीतील दि. 17मेच्या पहाटे पाच वाजता लॉकडाउन संपुष्टात येणार होता. त्यापूर्वीच रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्याच्या सूचना दिल्या.
केजरीवाल म्हणाले की, लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिल्लीत दिसून येत आहे. 26 एप्रिलपासून नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या लॉकडाउनचा उपयोग आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि संसाधनांना बळकट करण्यासाठी केला गेला आहे. पुढील आठवड्यात आणखी चांगला परिणाम होईल अशी अपेक्षा आहे. निर्बंध पूर्वीसारखेच राहतील.
Lockdown in Delhi escalates by a week, announces Chief Minister Arvind Kejriwal
महत्त्वाच्या बातम्या
- निखिल वागळे म्हणाले- हवीशी माणसं जातात अन् नकोशी राहतात; सोशल मीडियावर सुरू झाला टीकेचा भडिमार
- आनंदाची बातमी : भारतात लवकरच येणार रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन, रशियन राजदूतांची माहिती
- पदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीला घरचा आहेर, काँग्रेस मंत्री नितीन राऊतांचा ठाकरे सरकारविरोधात आंदोलनाचा निर्धार
- थरारक : एका स्पेअरपार्टमुळे बंद पडणार होता तळोजातील ऑक्सिजन प्लांट, 16 तास अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न, हवाई दलाने वेळेवर पोहोचवली मदत
- Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, २४ तासांत ४ हजारांहून जास्त मृत्यूंमुळे चिंता कायम