विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने २५ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १५ मेर्यंत लॉकडाउन राज्यात लागू केला होता. तसेच जम्मू आणि काश्मीयरमधील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीनर प्रशासनाने घेतला आहे. Lock down extended in Bihar and J and K
पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर बिहार सरकारने पाच मे ते १५ मेपर्यंत लॉकडाउन लागू केला होता. येत्या शनिवारी लॉकडाउनचा कालावधी संपत होता. आता पुढील दहा दिवसासाठी पुन्हा लॉकडाउन लागू केला आहे.
राज्यात आता रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. परंतु दररोज दहा हजाराच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या कारणामुळेच सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवला.
तत्पूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काल म्हटले की, लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बिहारवासीयांचे सहकार्य आवश्येक आहे. आपण सर्व एकत्रितपणे कोरोना संसर्गावर मात करू, असा मला विश्वा स आहे.
काश्मी रमध्ये १७ मेपर्यंत लॉकडाउन दरम्यान, जम्मू आणि काश्मी्रमध्ये नव्या निर्णयानुसार २० जिल्ह्यात १७ मे पर्यंत संचारबंदी लागू असेल. गेल्या चोवीस तासात काश्मीवरमध्ये ४५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच विवाह कार्यक्रमासाठी लोकांची उपस्थिती ५० वरुन २५ वर आणली आहे.
Lock down extended in Bihar and J and K
महत्त्वाच्या बातम्या
- सिरमने कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर वाढवले, आता १२ ते १६ आठवड्यांनी घ्या दुसरा डोस
- लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका
- आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणारल लसीकरणाला येणार वेग
- ठाकरे- पवार सरकार झोपलेलेच; तिकडे मराठा आरक्षणाबाबत केंद्राची फेरविचार याचिका! राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचे प्रतिपादन
- लक्षद्वीपजवळ चक्रीवादळ घोंगावतेय ; कोंकण किनारपट्टीवर तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार ; जोरदार पावसाची शक्यता
- Guru Ravi Shankar Biopic : श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आता लवकरच बायोपिक